शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

वातावरण बदलाचा फटका, रेणापुरात गारपीटने रबी पिके मातीमोल

By हरी मोकाशे | Published: March 18, 2023 5:29 PM

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होऊन सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.

लातूर : जिल्ह्यातील रेणापूर शहरासह तालुक्यातील काही भागात तसेच चाकूर तालुक्यातील जानवळ परिसरात शनिवारी दुपारी दीड तास विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे हाताशी आलेली रबी पिके मातीमोल झाली.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल होऊन सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तसेच अवकाळी पाऊस होत आहे. सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात रबी हंगामातील हरभरा, गहू, करडईची काढणी सुरु आहे तर ज्वारी कणसांनी बहरलेली आहे. या पावसामुळे हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे. काही ठिकाणीची ज्वारी भुईसपाट झाली आहे.

जिल्ह्यातील रेणापूरसह तालुक्यातील काही भागात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह दीड तास जोरदार पाऊस झाला. तसेच गारपीट झाली. या पावसामुळे रबी पिकांबरोबरच भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. आंबा, चिंच आणि द्राक्ष बागांनाही मोठा फटका बसला आहे. तसेच चाकूर तालुक्यातील जानवळ, उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरात गारांचा पाऊस होऊन नुकसान झाले आहे. जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरातही पाऊस झाला. या नुकसानीची पाहणी करुन पंचनामे करण्यात येतील, असे रेणापूरच्या तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरagricultureशेतीFarmerशेतकरी