शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
2
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
3
दुचाकीला कट मारल्याच्या वाद; विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून; बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील घटना
4
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
5
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
6
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ
7
Share Market Live Update : शेअर बाजारात हाहाकार, Sensex १००० अंकांपेक्षा अधिक आपटला; २७९ कंपन्यांच्या शेअर्सना लोअर सर्किट
8
तुम्ही लढत बसाल, वकील खुश होतील; घटस्फोटाच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश काय बोलले?
9
"आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत PM मोदींना विनाकारण ओढलं, प्रार्थना करतो की...'; शाह यांचा खर्गेंवर पलटवार
10
नसरल्लाहच्या मृत्यूचे पडसाद भारतात उमटले; लखनौला शेकडो लोक रस्त्यावर उतरले
11
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
12
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
13
अखेर Ashneer Grover यांनी BharatPe सोबतचा वाद सोडवला, काय झाली दोघांमध्ये डील?
14
Mominul Haque चं शतक; कमी वेळात सामना जिंकून दाखवणं टीम इंडियाला जमेल?
15
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
16
जीवघेणा प्रवास! डोक्यावर उत्तरपत्रिका, हातात चप्पल अन्...; शाळेत जाण्यासाठी शिक्षकाची धडपड
17
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
18
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
19
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
20
Bajaj Steel Industries Share Price : पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस लातूर झेडपीची मायेची मदत; मोफत सोयाबीन बियाणे वाटप

By हरी मोकाशे | Published: June 02, 2023 1:29 PM

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे

लातूर : नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्जाची परतफेड या तीन प्रमुख कारणांना वैतागून काही शेतकरी आपली जीवनयात्रा संपवितात. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. सेस फंडातून एकूण ५६५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास खरीपासाठी मोफत सोयाबीन बियाणे देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचा हा निर्णय राज्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा कणा आहे. मात्र, नापिकी, कर्जाच्या चिंतेने नैराश्यग्रस्त काही शेतकरी टाेकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प.चे सीईओ अभिनव गाेयल यांच्या सूचनेवरुन जिल्हा परिषदेने योजनांचा लाभ देण्याबरोबरच सामाजिक बांधलिकी जोपासत यंदाच्या खरीप हंगामासाठी मोफत सोयाबीन बियाणे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

५६५ कुटुंबांना अनुदानावर बियाणे...नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यात सन २००४ ते २०२३ या कालावधीत एकूण ५६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पंचायत समितीस्तरावरुन कृषी केंद्रांना या शेतकरी कुटुंबांच्या याद्याही देण्यात आल्या आहेत.

१५ लाखांचे बियाणे वितरण...महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने उत्पादित केलेले सोयाबीनचे बियाणे ५६५ शेतकरी कुटुंबांना दिले जाणार आहे. सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून जिल्हा परिषदेने जवळपास १५ लाख रुपयांचा निधी बियाणासाठी उपलब्ध करुन दिला आहे.

औश्यात सर्वाधिक आत्महत्या...जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या ह्या औसा तालुक्यात झाल्या असून १३३ अशी संख्या आहे. लातूर तालुका- ७४, निलंगा- ८५, रेणापूर- ४८, शिरुर अनंतपाळ २३, उदगीर- ३४, अहमदपूर- ६७, चाकूर- ४३, देवणी- ४०, जळकोट तालुक्यातील १८ अशा एकूण ५६५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास प्रत्येकी एक बॅगप्रमाणे सोयाबीन बियाणांचे वितरण होणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे बळीकटीकरण...जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी विविध शासन योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. आता या कुटुंबांना सोयाबीन बियाणाची प्रत्येकी एक बॅग मोफत देण्यात येणार आहे.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्या