शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
3
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
4
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
5
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
6
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
7
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
8
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
9
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
10
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
11
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
12
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
13
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
14
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
15
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
16
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
17
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
18
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
19
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
20
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस

'मे' पेक्षा 'जून' अधिक तापदायक; वरुणराजाच्या प्रतीक्षेत ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

By हरी मोकाशे | Published: June 21, 2023 5:36 PM

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही.

लातूर : मृग नक्षत्र संपत आले तरी अद्याप वरुणराजाची बरसात नाही. पावसाळ्याच्या दिवसांत मे महिन्यापेक्षा अधिक तीव्र उन्हं जाणवत आहे. परिणामी, जलसाठे आटत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा वाढल्या आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीत आणखीन २१ गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ गावांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.

यंदाच्या उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून अधिक उष्णता जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य होणार असा अंदाज व्यक्त होत होता. रविराजाने रौद्ररूप धारण केल्याने मे महिन्यात अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. त्यामुळे पावसाळा कधी सुरू होईल आणि वरुणराजा कधी बरसेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. तीव्र उन्हामुळे जलसाठे आटू लागले होते तर जलस्त्रोत कोरडे पडू लागले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा वाढल्या.

मृग नक्षत्र निघाल्यानंतर सर्वांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, तो संपत आला तरी अद्यापही पावसाने हजेरीही लावली नाही. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शिवाय, पाणीटंचाईचे चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील १२३ गावांत पाणीटंचाई जाणवत असून, त्यातील १०३ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक चटके...जिल्ह्यातील १२३ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. त्यात सर्वाधिक टंचाई अहमदपूर तालुक्यात आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून १०३ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

२० गावांतील नागरिक हैराण...१२३ पैकी १०३ गावांत अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, अद्यापही २० गावांत अधिग्रहण सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे तेथील अबालवृद्धांना भरउन्हात पायपीट करीत पाणी आणावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. या गावांत तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.

अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली गावे...तालुका                                    गावेलातूर                                     ०५औसा                                     ३१निलंगा                                     ०४रेणापूर                                     ०६अहमदपूर                         ३९चाकूर                                     ०७शिरूर अनंत.                         ००उदगीर                                     ०६देवणी                                     ००जळकोट                                    ०५

देवणी, शिरूर अनंतपाळ टंचाईमुक्त...जिल्ह्यातील देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील एकाही गावास पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांत अद्याप एकही अधिग्रहण करण्यात आलेले नाही. अहमदपूर तालुक्याच्या पाठोपाठ औसा तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. तिथे ३४ गावांत पाणीटंचाई असून, सध्या अधिग्रहणाद्वारे ३१ गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

टंचाईच्या झळा वाढल्या...एप्रिलच्या अखेरीस जिल्ह्यातील ३० गावांत पाणीटंचाई जाणवत होती. तेव्हा १५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. मे महिन्यात टंचाई वाढून ती ८५ गावांना जाणवत होती. ६२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. दरम्यान, जूनच्या पहिल्या आठवड्यात १०२ गावे टंचाईने त्रस्त झाली. ९० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली होती.

टॅग्स :WaterपाणीlaturलातूरRainपाऊस