शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

हिंमत असेल तर शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करून दाखवा; राजू शेट्टी यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:41 IST

ज्या कोणाचे हा महामार्ग करण्याचे ड्रीम आहे, ते ड्रीम शेतकऱ्यांचे वाटोळे करून पूर्ण होऊ दिले जाणार नाही: राजू शेट्टी

लातूर : नागपूर-रत्नागिरी महामार्गाला नवीन शक्तिपीठ महामार्ग करण्याची अधिसूचना सरकारने काढली आहे. पण या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी जमिनी अधिग्रहण करून दाखवाव्यात, असे आव्हान शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषद मंगळवारी गिरवलकर सभागृहात झाली. मंचावर प्रा. एच. एम. देसरडा, माजी आमदार त्रिंबक भिसे, प्रकाश पाटील, ॲड. उदय गवारे, ॲड. गजेंद्र येळकर, सम्राट मोरे, प्रकाश पाटील, विजय पाटील, अजय बोराडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, राजकीय नेत्यांना शक्ती देण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग आहे. वास्तविक पाहता या महामार्गामुळे कुठला विकास होणार नाही. २७ ते २८ हजार कोटींमध्ये होणाऱ्या महामार्गाचा खर्चही ८६ हजार कोटींचा दाखविला आहे. यातून ५० हजार कोटी रुपये हडप करण्याचा डाव नेत्यांचा आहे, असा आरोपही त्यांनी केला. कसल्याही परिस्थितीत हा महामार्ग होणार नाही. बारा जिल्ह्यांतून हा महामार्ग जातो. त्यातील सर्व शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. नागपूर-रत्नगिरी महामार्गाला समांतर हा महामार्ग करण्याची अधिसूचना आहे. या महामार्गातून फक्त ७० ते ८० किमी अंतर कमी होऊ शकते. परंतु, त्यात हजारो हेक्टर जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आहे. महामार्ग रद्द केल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत. सध्या मोजणीला विरोध आहे. माती परीक्षणाला विरोध आहे. कसल्याही परिस्थितीत शासनाचा हेतू साध्य होऊ दिला जाणार नाही. ज्या कोणाचे हा महामार्ग करण्याचे ड्रीम आहे, ते ड्रीम शेतकऱ्यांचे वाटोळे करून पूर्ण होऊ दिले जाणार नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले.

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पारितयावेळी लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या मराठवाड्यातील जिल्ह्यांसह सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरीय परिषदेला उपस्थिती होती. शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या बॅनरखाली सर्व शेतकरी एकवटले आहेत. त्यांनी या परिषदेत कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ दिला जाणार नाही, असा ठराव पारित केला.

९० वर्षे टोल लागेल८६ हजार कोटींचा खर्च शक्तिपीठ महामार्गाला होईल, असे शासनाला अपेक्षित आहे. हा खर्च फेडण्यासाठी ९० वर्षे टोल द्यावा लागणार आहे. नागपूर-रत्नागिरी महामार्ग असताना त्याला समांतर शक्तिपीठ महामार्ग करण्याचे कारण काय? गरज नसताना हा मार्ग कशासाठी, असा सवालही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

टॅग्स :laturलातूरRaju Shettyराजू शेट्टीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी