शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

नेपाळच्या आयात टोमॅटोचा स्थानिक उत्पादकांना फटका, दर निम्म्यावर

By आशपाक पठाण | Published: August 14, 2023 5:20 PM

दोन महिन्यांपासून टोमॅटोमच्या दरात अचानक वाढ झाली. ५ रूपये किलोचे टोमॅटो आठवडाभरात बघता बघता १६० रूपये किलोंवर पोहचले.

लातूर : सोन्याचा भाव आलेले टोमॅटो दोन महिन्यातच कोसळले असून लातूरच्या बाजारात ३० ते ६० रूपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री होत आहे. केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयात केल्याने स्थानिक बाजारात दर कोसळले आहेत, त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून शासनाच्या धोरणाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निषेध केला आहे.

दोन महिन्यांपासून टोमॅटोमच्या दरात अचानक वाढ झाली. ५ रूपये किलोचे टोमॅटो आठवडाभरात बघता बघता १६० रूपये किलोंवर पोहचले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे टोमॅटो होते, अशा शेतकऱ्यांना सोन्याचा भाव मिळाला. किरकोळ बाजारातही २० किलोचे कॅरेट २ हजार रूपये किलोप्रमाणे विक्री झाले. त्यामुळे अनेकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाले. हॉटेल, मेसमध्येही टोमॅटोला पर्याय म्हणून चिंचाचा वापर करण्यात आला. मागील आठवडाभरात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गंजगोलाई, राजीव गांधी चौक, रेणापूर नाका, रयतू बाजारात टोमॅटो प्रतिकिलो ३० ते ६० रूपये किलोप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेते शब्बीर शेख यांनी सांगितले.

आणखी दर घसरण्याची भीती...

टोमॅटोची आवक वाढली असून ग्राहकांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे. मागच्या काही दिवसात किरकाेळ विक्रीही २०० रूपयांपर्यंत प्रतिकिलो गेली होती. सध्या चांगले टोमॅटो ५० रूपये किलोप्रमाणे विक्री होत आहेत. पुढील आठवड्यात आणखी दर कमी होण्याची भिती आहे, दरवाढ झाल्याचे पाहून अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. दर कमी झाल्याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे.

सरकारचे धोरण शेतकरीविरोधी : सत्तार पटेल

सोयाबीन परवडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची शेती केली. सुरुवातीस चांगला भाव मिळाला नाही तरीपण आज ना उद्या भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या बागा जतन केल्या. ज्यावेळेस शंभर रुपयांवर दर टोमॅटोला मिळू लागला त्यावेळेस सरकारचे डोके फिरले आणि थेट नेपाळ वरून टोमॅटो आयातीचा निर्णय झाला. तेथील टोमॅटो बाजारात येताच ५० टक्के दर घटले. ज्या वेळेला बाजारामध्ये टोमॅटो दोन रुपये किलो प्रमाणे विकले जात होते त्यावेळेला सरकार बघ्याची भूमिका घेत होते. सरकारने कसलाही हस्तक्षेप त्या वेळेला केला नाही किंवा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून त्यांना धीर देण्याचे काम सुद्धा सरकारने केले नाही. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण प्रत्येकवेळी शेतकऱ्यांना मारक असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निषेध...

केंद्र शासनाने नेपाळमधून टोमॅटो आयात केले. त्यामुळे बाजारात टोमॅटोचे दर पडले. दहा वर्षातून पहिल्यांदाच शेतकऱ्यांना एवढा चांगला भाव मिळाला. दर कमी शासन मदतीसाठी पुढे येत नाही. शेतकरी फायद्यात आला की हस्तक्षेप का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. टोमॅटो आयातीचा निर्णय निषेधार्ह असल्याचे जिल्हाध्यक्ष अरूणदादा कुलकर्णी, राजेंद्र मोरे, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, जयराम पाटील आदींनी सांगितले

 

टॅग्स :laturलातूर