शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

लातुरात ई-केवायसीकडे शेतकऱ्यांची पाठ; मुदत संपत आली तरी १ लाख लाभार्थी ई-केवायसीविना !

By हणमंत गायकवाड | Published: August 25, 2022 1:59 PM

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र मार्फत बायोमेट्रिक पद्धतीने ई- केवायसी करण्यात येत आहे.

लातूर: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांचे ई- केवायसी प्रमाणिकीकरण करणे आवश्यक आहे. तरच या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यात ३ लाख १४ हजार ५८८ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे.त्यापैकी १ लाख ९६ हजार ८१६ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित १ लाख १७ हजार ७२२ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित आहे. 

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र मार्फत बायोमेट्रिक पद्धतीने ई- केवायसी करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात पी.एम. किसान योजनेसाठी ३ लाख १४ हजार ५८८ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्यापैकी १ लाख ९६ हजार ८१६ शेतकऱ्यांनी ई- केवायसी करून घेतलेली आहे. मात्र १ लाख १७ हजार ७२२ शेतकऱ्यांचे इ केवायसी प्रमाणीकरण शिल्लक आहे. ३१ ऑगस्ट पर्यंत या शेतकऱ्यांनी ई- केवायसी केले नाही तर त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही. त्यासाठी प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. 

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी इ केवायसी प्रमाणिकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने इ केवायसी प्रामाणिकरण... प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत् लातूर जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना खालील प्रमाणे (ekyc) ई-केवायसी व (OTP) ओटीपी किंवा बायोमॅट्रीक प्रणालीव्दारे करण्यासाठी पर्याय पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेली असून त्यामध्ये संबंधित लाभार्थी शेतकरी यांनी पी.एम. किसान योजनेचा https://pmkisangovin या वेबसाईटवरील (Farmer Corner) फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲपव्दारे (OTP) ओटीपी व्दारे लाभार्थ्यांना स्वत: ekyc प्रमाणिकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केद्र (सीएससी) केद्रावरती (ekyc) ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल.

टॅग्स :laturलातूरagricultureशेतीFarmerशेतकरी