शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी

By हरी मोकाशे | Updated: June 12, 2024 18:11 IST

कोरड्या घरणी प्रकल्पात आले अडीच टक्के पाणी

लातूर : मृगाच्या प्रारंभापासून सतत पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये मध्यम प्रकल्पांमध्ये ७.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: जोत्याखाली गेलेल्या घरणी मध्यम प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु झाल्याने २.५७ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. त्यातच यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण राहिला. तापमानाचा पारा ४१ अंशसेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होत होती. परिणामी, जलस्त्रोत कोरडे पडत होते तर जलसाठे आटू लागले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या अखेरीस भूजल पातळी २.६७ मीटरने खालावली होती. पावसाळा कधी सुरु होतो, याकडे लक्ष लागून होते.

प्रकल्प - उपयुक्त पाणीसाठा (टक्के)तावरजा - ००रेणापूर - २१.१७व्हटी - ००तिरु - ००देवर्जन - २.८९साकोळ - ३.११घरणी - २.५७मसलगा - ४५.५०एकूण - ९.६३

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा...मृगास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून सतत कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे तहानलेल्या प्रकल्पांना लाभ होत आहे. पाच दिवसांमध्ये रेणापूर मध्यम प्रकल्पात १९.५१ टक्के, घरणी प्रकल्पात २.५७ टक्के तर मसलगा प्रकल्पात ३४.४४ टक्के जलसाठा वाढला आहे. सर्वाधिक पाणीसाठा निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात झाला आहे.

१० दलघमीने वाढले पाणी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. शुक्रवारी एकूण १५.४९० दलघमी पाणीसाठा होता. आता २५.३१६ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. पाच दिवसांच्या कालावधीत ९.८२६ दलघमी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना दिलासा मिळाला असून आशा पल्लवित झाल्या आहेत.

पाण्याचा प्रश्न कमी होणार...तीव्र उन्हामुळे यंदा ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय, ३८९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. पाऊस होत असल्याने मध्यम प्रकल्पात पाणी वाढत आहे. त्यामुळे पाणीप्रश्न कमी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस