शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

चिंता वाढली; तेरणावरील सर्व बंधाऱ्यांना लागली खरडण !

By संदीप शिंदे | Updated: April 6, 2024 11:30 IST

औराद बंधाऱ्यात केवळ १० दहा टक्के साठा : नदीकाठच्या गावांचे अधिग्रहणाचे प्रस्ताव

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातून निम्न तेरणा नदी वाहते. या नदीवरील सातपैकी सहा बंधारे कोरडे पडले आहेत. यातच दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असून गुरुवारी औराद शहाजानी हवामान केंद्रावर ४३ अंशाची नोंद झाली आहे. परिणामी, बाष्पीभवन वाढले असून, तेरणा व मांजरा नदीवरील सर्व उच्चस्तरीय बंधारे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांनाही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या भागातील अनेक गावांनी विंधन विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल केले.

औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा, मांजरा दोन्ही नद्यांवरील उच्चस्तरीय बंधारे, कोल्हापुरी बंधारे कोरडे पडले आहेत. याशिवाय या भागातील लघु साठवण तलावही कोरडेठाक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. परतीचा पाऊस न पडल्याने व लवकरच पाणीसाठा उन्हाळ्याच्या प्रारंभी कोरडाठाक झाल्याने या भागातील अनेक विंधन विहिरी बंद पडल्या असून, या भागात पाणीटंचाईचा सामना एप्रिल महिन्यामध्येच करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

तगरखेडा ग्रामपंचायतीने दोन विंधन विहिरीचा प्रस्ताव अधिग्रहणासाठी निलंगा तहसीलकडे सादर केल्याचे उपसरपंच मदन बिराजदार म्हणाले. याच पद्धतीने तेरणापट्टा भागातील पाणीसाठा यावर्षी लवकर आटल्याने अनेक गावातील विंधन विहिरी बंद पडल्या असून, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेवरती मोठ्या प्रमाणात ताण आल्याने गावातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे. या भागाला विंधन विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करावा अशी मागणी अनेक गावातील लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रशासनाकडे केली जात आहे. सातपैकी औराद शहाजानी उच्चस्तरीय बंधाऱ्यात केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर सर्वच बंधारे काेरडेठाक पडले असल्याचे जलसिंचन शाखा अधिकारी दिनेश काेल्हे यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी म्हणाले, अधिग्रहणाचा आलेला प्रस्ताव त्याच दिवशी मंजूर करीत असून, ग्रामपंचायतीच्या बोर्डावर अधिग्रहण केलेल्या जलस्त्रोताचे ठिकाण दाखविले जात आहे. सध्या २५ गावांनी ४१ प्रस्ताव पाठविले असून, २६ प्रस्ताव मंजूर झाले आहेत.

हजारो हेक्टरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात...चार वर्षे सातत्याने चांगला पाऊस झाला. यातच गेल्या वर्षीपासून उसाला चांगला दर मिळत असल्याने निलंगा, लातूर, धाराशिव व शेजारील कर्नाटक राज्यातील अनेक साखर कारखाने पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले. त्यामुळे तेरणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी शाश्वत पीक म्हणून मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र, यावर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यात परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात आले आहे.

तापमानाचा पारा ४४ अंशावर...औराद शहाजानीसह परिसरात तापमानाचा पारा वाढला असून, बुधवारी ४२.५ अंशांवर असलेले तापमान गुरुवारी ४३ तर शुक्रवारी ४४ अंशांवर पोहोचल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. दरम्यान, याच वातावरणात हलकेसे ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे उकाडा वाढलेला असून पुढील आठवड्यात सीमावर्ती भागामध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी बाजारात शुकशुकाट दिसून येत असून, पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी