शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भावफलक, मालाचा साठा नोंदीत हलगर्जीपणा; लातूरच्या ३२ कृषी सेवा केंद्र चालकांची सुनावणी !

By हरी मोकाशे | Updated: July 25, 2024 19:12 IST

लातूर जिल्हास्तरीय कृषी समितीच्या निर्णयाकडे लक्ष

लातूर : खरीप हंगामात जिल्ह्यातील काही कृषी सेवा केंद्र चालकांनी नियमाप्रमाणे बी-बियाणे, खतांच्या साठ्याच्या नोंदी न ठेवणे, दुकानाच्या दर्शनी भागात भावफलक लावले नसल्याचे आढळून आल्याने तालुकास्तरीय कृषी अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या होत्या. त्यातील ३२ केंद्र चालकांची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसमोर गुरुवारी सुनावणी झाली. आता जिल्हास्तरीय समितीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगाम हा हुकमी मानला जातो. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची भिस्त खरिपावर अवलंबून आहे. या हंगामाच्या कालावधीत बोगस बी-बियाणे, खते, कीटकनाशके विक्री होण्याची भीती अधिक असते. याशिवाय, जादा दराने विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नसते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुकास्तरावर एक अशी एकूण ११ पथके नियुक्ती केली होती. या पथकांनी जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी केली. तेव्हा काही त्रुटी आढळून आल्या.

३५ केंद्र चालकांना नोटिसा...बी-बियाणे, खते खरेदीचे बिल नसणे, बियाणे, खतांच्या स्त्रोताची माहिती न ठेवणे, सेवा केंद्राच्या दर्शनी भागात भावफलक न लावणे, प्रत्यक्ष विक्री आणि नोंदीत तफावत आढळून येणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळून आल्याने ३५ केंद्र चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर खुलासा सादर करण्यासाठी आठवड्याची मुदत देण्यात आली होती.

३२ केंद्र चालकांचे खुलासे...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नोटिसा बजावण्यात आलेल्यांची सुनावणी झाली. तेव्हा ३२ केंद्रचालक उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद बिडबाग, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संतोष लाळगे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

नियमानुसार कारवाई होणार...सुनावणी झालेल्या ३२ कृषी सेवा केंद्र चालकांचे खुलासे जिल्हास्तरीय समितीसमोर ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर समितीच्या निर्णयानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्र चालकांवर कारवाई होईल.- संतोष लाळगे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर