शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

मानधन वाढीसाठी शासनाकडून नुसतीच आश्वसानाची खैरात! 

By आशपाक पठाण | Updated: July 13, 2024 18:08 IST

राज्यात ३५०० गटप्रवर्तकांची ओरड : तुटपुंज्या माेबदल्यात किती दिवस करायचे काम

आशपाक पठाण, लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कार्यरत असलेल्या राज्यातील जवळपास ३ हजार ५०० आशा गटप्रवर्तकांना मिळणारे मानधन प्रवास खर्चालाही पुरत नसल्याने मुलांच्या शिक्षणासह, संसार चालवायचा कसा, असा प्रश्न निर्माण आहे. गतवर्षी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी मासिक १० हजार रूपये मानधन वाढीची घोषणा केली. प्रत्यक्षात एक हजार वाढीचा अध्यादेश काढला. त्यामुळे गटप्रवर्तकांच्या संसाराचे गणित कोलमडले आहे. हिवाळी अधिवेशन झाले, पण निर्णय न झाल्याने गटप्रवर्तकांची निराशा झाली आहे.

गटप्रवर्तकांच्या प्रश्नाबाबत ११ जून रोजी कृती समितीने मुंबई येथे आरोग्य सहसंचालक बोरकर व राज्य समन्वयक स्वाती पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली होती. गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये मोबदल्यात वाढ मिळावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, एप्रिल २०२४ पासून केंद्राचा मोबदला मिळालेला नाही तो द्यावा, राज्य शासनाने मोबदल्यात केलेली वाढ ५ जून २०२४ च्या जीआर नुसार मोबदला त्वरित द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २ जुलै रोजी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनावर गट प्रवर्तकांना दहा हजार रुपये वाढीव मोबदला मिळावा, यासाठी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी १० हजार वाढीव मोबदल्याची घोषणा केली. पण प्रत्यक्षात अध्यादेश काढताना त्यात केवळ १ हजार वाढ देण्यात आली. त्यामुळे गटप्रवर्तकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

उसनवारीवर चालतो घरगाडा...

प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कार्यरत असलेल्या आशा गटप्रवर्तकांना केंद्रातील दहा ते बारा गावांना भेटी देऊन आशा स्वयंसेविकांच्या कामाचा आढावा घ्यावा लागतो. विविध योजनांची माहिती देत ते काम वाढविण्यासाठी आशांना प्रेरीत करावे लागते. मासिक बैठक घेऊन आशांनी केलेल्या कामाची नोंदी घेऊन त्यांचे मानधन काढणे आदी कामे करावे लागतात. एका गटप्रवर्तकाकडे किमान २० ते २५ आशांच्या कामाची जबाबदारी आहे. दिवसेंदिवस काम वाढतच चालले आहे, महागाई वाढल्याने घर खर्च भागविणे कठीण झाले आहे. सध्या मिळणारे मानधन एकत्रित मिळत नाही, त्यामुळे उसनवारीवर घरगाडा चालवावा लागतो, असे सांगण्यात आले.

हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढला पण...

आशा गटप्रवर्तक कृती समितीचे भगवानराव देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. आशांना ५ हजार वाढ दिली पण कामाचा अधिक भार असलेल्या गटप्रवर्तकांना १ हजार वाढ करून चेष्टा केली आहे. दहा हजार वाढीची घोषणा त्यांनीच केली होती. आता त्याची अंमलबजावणी करावी म्हणून राज्यस्तरावर कृती समितीकडून पाठपुरावा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लवकरच वाढीव मोबदल्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :laturलातूर