शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे यांची दादांविरूद्ध तक्रार, अमित शाह यांच्या उत्तराचा राऊतांकडून सस्पेन्स
2
वक्फ कायदा लागू झाल्यानंतर गावकऱ्यांना आली पहिली नोटीस; खाली करा नाहीतर कर द्या, तामिळनाडूत खळबळ
3
मृत्यूनंतर माणसाचे काय होते? आत्मा सात जगांच्या प्रवासाला निघतो...; ऑक्सफर्डच्या फिलॉसॉफरने सांगितले...
4
आता तुमच्या खात्यातून बायकोही करू शकणार पेमेंट; UPI मध्ये आलं नवीन फीचर
5
Beed: पाठलाग करून भाजपा पदाधिकाऱ्यावर कोयत्याचे वार, खुनाच्या घटनेने माजलगाव हादरलं
6
"एक घोळ झालाय, हा सूरज चव्हाणचा बायोपिक नाही", 'झापुक झुपूक' सिनेमाबाबत केदार शिंदेंचा मोठा खुलासा
7
राधिका मदानने केली सर्जरी? व्हायरल व्हिडिओवर म्हणाली, "आयब्रो आणखी वर हवे होते..."
8
IPL 2025: CSKच्या फॅन्सची चिंता वाढली! ऋतुराज पाठोपाठ MS धोनीलाही दुखापत? Viral Video मुळे चर्चा
9
NATO चा हल्ला झाला, तर सर्वात पहिले 'खाक' होणार 'हे' देश, रशियाची खुली धमकी!
10
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: बुधवारी गणेश पूजनाला विशेष महत्त्व; पाहा, महात्म्य, मान्यता
11
काय सांगता? तुमचा फोन चोरीला गेला, हरवला तरी आता नो टेन्शन; 'या' सोप्या स्टेप्सने शोधा झटपट
12
Vivah Muhurat 2025: १४ एप्रिलपासून पुन्हा सुरु झाले सनई चौघडे: डिसेंबरपर्यंतचे विवाह मुहूर्त जाणून घ्या!
13
द्वारका किती प्राचीन आहे? हे जाणून घेण्यासाठी, एएसआयने समुद्राखाली चालवली विशेष मोहीम
14
blinkit सोबत हातमिळवणी, Airtel चा शेअर बनला रॉकेट; दिसली जोरदार तेजी
15
पद, पगार चांगली; तरी लाचेची हाव वाढली; राज्यात ९७ दिवसांत २१५ लाचेचे गुन्हे दाखल
16
IPL 2025: MS Dhoni म्हणजे 'ब्रँड' ! उभं केलंय कोट्यवधींचं साम्राज्य; जाणून घ्या नेटवर्थ किती?
17
'या' लोकांना मिळणार नाही आयुष्मान कार्ड; तुमचे नाव तर यादीत नाही ना? असे तपासा ऑनलाईन
18
IPL 2025: CSKचा झेंडा घेऊन स्टेडियममध्ये जायचं नाही... लखनौमध्ये फॅन्सना आला विचित्र अनुभव (Video)
19
निर्णय चुकीचा..! पंचांचे 'निलंबन'; महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या वादग्रस्त निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब
20
Mangal Neptune Yuti 2025: २० एप्रिल रोजी तयार होणारा नवपंचम राजयोग उघडणार 'या' तीन राशींचे भाग्य!

गेल्या उन्हाळ्यात पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिलं; तब्बल १० महिन्यांनी आले पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:32 IST

गेल्या उन्हाळ्यात गावास पाणी दिले; विहीर अधिग्रहणाचे यंदा पैसे मिळू लागले !

लातूर : भरउन्हात गावकऱ्यांची होणारी पायपीट पाहून बळीराजाने पिकांचे पाणी थांबवून गावास पाणी दिले. त्यामुळे पदरात पडणाऱ्या पिकांचे नुकसान सहन करीत गावची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यांचे अधिग्रहणाच्या पैशाकडे डोळे लागून होते. तब्बल दहा महिन्यांनी ३ कोटी ५६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

दोन वर्षांपूर्वी पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे गतवर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवत होत्या. फेब्रुवारीपासून तर टंचाईचे चटके वाढले होते. ग्रामीण भागातील नागरिकांची घागरभर पाण्यासाठी एक-दीड किलोमीटरपर्यंत पायपीट होत होती. जिल्हा प्रशासनाकडून टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात येत होत्या. परंतु, उन्हामुळे जलस्त्रोत काेरडे पडत होते.

दरम्यान, पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पीक घेतले होते. मात्र, पाण्याची गंभीर स्थिती पाहून पिकांचे पाणी बंद करुन अधिग्रहणाच्या माध्यमातून गावास पाणीपुरवठा सुरु केला. त्यामुळे गावकऱ्यांची तहान भागली होती.

६९४ अधिग्रहणेजिल्ह्यात एकूण ७८६ गावे आहेत. त्यातील बहुतांश गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. त्यामुळे ७९४ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला होता.उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडू लागल्याने काही गावांसाठी टँकर सुरु करण्यात आले. ४७ टँकरच्या माध्यमातून जलपुरवठा करण्यात आला होता.

शेतकऱ्यांकडून विचारणा...गेल्या वर्षी जूनपासून पावसाला सुरुवात झाल्याने टंचाई कमी झाली. त्यानंतर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पैशाची चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र, निधी नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली होती. मार्चअखेरीला अधिग्रहणापोटी ३ कोटी ५६ लाख तर टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २ कोटी ३७ लाखांचा निधी उपलब्ध झाला.

निधी वर्ग करणे सुरूपाणीटंचाई निवारणासाठीच्या उपाययोजनांसाठी शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये निधी उपलब्ध झाला आहे. तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहे.- बाळासाहेब शेलार, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रwater scarcityपाणी टंचाई