शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Latur: ऊस तोड कामगारांच्या मुलांची यंदाही होरपळ, लातूर जिल्ह्यात ४ वसतिगृहांना मंजुरी

By आशपाक पठाण | Published: August 29, 2023 5:14 PM

Latur: ऊस तोड कामगारांच्या मुलांची हेळसांड होणार नाही, यासाठी राज्य शासनाने त्यांना वसतिगृह मंजूर केले आहेत. गतवर्षी राज्यात जवळपास ८० वसतिगृहाला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात केवळ २० वसतिगृह सुरू करण्याचे आदेश निघाले.

- आशपाक पठाण लातूर - ऊस तोड कामगारांच्या मुलांची हेळसांड होणार नाही, यासाठी राज्य शासनाने त्यांना वसतिगृह मंजूर केले आहेत. गतवर्षी राज्यात जवळपास ८० वसतिगृहाला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात केवळ २० वसतिगृह सुरू करण्याचे आदेश निघाले. त्यात लातूर जिल्ह्यातील ४ वसतिगृहाचा समावेश नसल्याने अजून किमान एक वर्षे तरी कामगारांच्या मुलांना वाट पहावी लागणार आहे.

लातूर जिल्ह्यात दरवर्षी मांजरा, विकास, रेणा, ट्वेंटीवन, जागृती, मारूती महाराज, विकास २ तोंडार, किल्लारी आदी ८ साखर कारखाने कार्यरत आहेत. ऊस उत्पादनात लातूर, रेणापूर, औसा हे तालुके अग्रेसर आहे. हंगामात ऊस तोडणीचे काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी राज्य शासनाने त्यांच्यासाठी वसतिगृहे मंजूर केली आहेत. मात्र मंजुरी मिळून वर्ष लोटले तरी अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. यंदाच्या गळीत हंगामातही मजुरांना आपल्या मुलांची सोय स्वत:हून करावी लागणार आहे. त्यामुळे यंदाही शिक्षणाचा बट्ट्याबोळ होण्याची शक्यता आहे.

जळकोट, रेणापूरला प्रत्येकी २ वसतिगृह...ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी जळकोट आणि रेणापूर तालुक्यात प्रत्येकी २ असे एकुण चार वसतिगृह मंजूर करण्यात आली आहेत. जळकोट तालुक्यातील वाडी, तांड्यावरील अनेकजण ऊसतोडणीसाठी जातात. तसेच रेणापूर तालुक्यातूनही अनेकजण हंगामात ऊसतोडणीला जात असल्याने या भागातील मुलांची सोय व्हावी, मजुरांच्या मुलांना चांगला आश्रय मिळावा म्हणून वसतिगृह मंजूर करण्यात आले आहे. मात्र, आखणीन किती दिवस त्याची प्रतिक्षा करावी लागणार हे मात्र अजूनही निश्चित नाही.

कार्यारंभ आदेश निघाल्यावर प्रक्रिया...समाजकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात येणाऱ्या ऊस तोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाकडून मागील वर्षीच मंजुरी मिळाली आहे. परंतू कार्यारंभ आदेश आल्याशिवाय सुरू करता येणार नसल्याने अजून किती दिवस वाट पहावी लागणार हे स्थानिक अधिकारीही सांगू शकत नाही. यासंदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आ. विक्रम काळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, शासनादेश आल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, असे उत्तर समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याने आता पाठपुरावा कोण करणार, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र