शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

लातूरात पशुधन ५ लाख अन् ईअर टॅगिंग केले ६ लाख; तरीही काम अपूर्णच!

By हरी मोकाशे | Updated: May 20, 2024 18:39 IST

लातूर जिल्हा परिषद, पशुसंवर्धनचे कर्मचारी पोहोचताहेत गोठ्यागोठ्यात

लातूर : राज्य शासनाने प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने काही महिन्यांपासून पशुधनाचे आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख ११ हजार ६५० पशुधन असतानाही पशुसंवर्धनने उद्दिष्टपूर्तीपेक्षा अधिक काम करीत ६ लाख ८ हजार ईअर टॅगिंग केले आहे. मात्र, अद्यापही हे काम अपूर्णच असल्याने अधिकारी, कर्मचारी हतबल होत आहेत.

भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर शिक्का असल्याशिवाय कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी- विक्री, उपचार केले जाणार नाही. त्यामुळे येत्या १ जूनपर्यंत पशुधनाचे आधारकार्ड काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जवळपास सन २०१६- १७ पासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाचे आधारकार्ड काढून घ्यावे म्हणून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.

औसा तालुक्यात सर्वाधिक पशुधन...तालुका - पशुधनअहमदपूर - ६५ हजार ७२९औसा - ७६ हजार ६२२चाकूर - ५१ हजार ९९९देवणी - ३० हजार २४६जळकोट - २६ हजार ३९७लातूर - ७० हजार ६१६निलंगा - ६८ हजार ३७६रेणापूर - ४७ हजार १९९शिरुर अनं. - २० हजार ८२७उदगीर - ५३ हजार ६३९एकूण - ५ लाख ११ हजार ६५०

ईअर टॅगिंग नसल्यास उपचारही नाही...शासनाने प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग बंधनकारक केले आहे. वास्तविक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन घेणे आवश्यक आहे. ईअर टॅगिंगमुळे नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का अथवा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पशुधन दगावल्यास त्या पशुधनाच्या मालकास नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच खरेदी- विक्री करणे सोयीचे होणार आहे. ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर पशूधन खरेदी- विक्री करता येणार नाही. तसेच शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारही केले जाणार नाहीत.

पशुपालकांचा हलगर्जीपणा, ईअर टॅगिंगचे काम संपेना...सुरुवातीस बहुतांश पशुपालकांमध्ये ईअर टॅगिंगसंदर्भात उदासीनता होती. त्यांना यासंदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. मात्र, काही पशुपालक ईअर टॅगिंग करतात आणि त्यानंतर ते टॅग काढून टाकतात. तसेच काही वेळेस खरेदी- विक्रीवेळी टॅग काढून टाकण्यात येते. अशा समस्यांमुळे पशुधनाच्या तुलनेत टॅगिंगचे काम अधिक प्रमाणात झाल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

पशुपालकांनी पशुधनाचे आधारकार्ड काढून घ्यावे...पशुधन आधारकार्ड काढण्यासाठी सातत्याने जनजागृती करुन मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ लाख ११ हजार पशुधन असून ६ लाख ८ हजार टॅगिंग करण्यात आले आहे. ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर कुठल्याही मोफत सुविधा, योजना पशुपालकांना मिळणार नाही. त्यामुळे पशुधनास ईअर टॅगिंग करुन घ्यावे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र