शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

मतांचा बाजार मांडला, मतदानाचा हक्क परत घ्या! सत्तानाट्यावर बोटाला चुना लावून आंदोलन

By शिवराज बिचेवार | Published: July 03, 2023 5:09 PM

सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले. हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे.

नांदेड- राज्यात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. भाजप आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी महाविकास आघाडी, नंतर शिवसेनेतील बंडखोरी अन् आता राष्ट्रवादीतील फोडाफोडी ही सर्वसामान्य मतदारांची शुद्ध फसवणुक आहे. 

राजकर्त्यांनी आमच्या मतांचा बाजार मांडला असून आमचा मतदानाचा हक्क शासनाने परत घ्यावा या मागणीसाठी तरुणांनी बोटाला चूना लावून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केले.निवेदनानुसार, आम्ही प्रत्येक निवडणुकीत उत्साहात मतदान करतो. परंतु २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय मंडळींनी आमच्या मतांची चेष्टा मांडली आहे. आम्ही २०१९ मध्ये एकदा मतदान केले. परंतु सत्तेसाठी वाट्टेल ते करणार्या राजकारण्यांनी तीन मुख्यमंत्री आमच्या माथी मारले. हा सर्व प्रकार लोकशाहीवर दरोडा टाकण्यासारखा आहे. काल महाराष्ट्रात परत एक शपथविधी झाला. हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असून लोकशाहीचा खून करणारा आहे. हे सर्व पाहून लोकशाहीवरील आमचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे लोकशाहीने आम्हाला दिलेला मतांचा अधिकार शासनाने परत घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी महेंद्र देमगुंडे, शंकर स्वामी, अरुण धुतराज, गजानन सरोदे, हनमंत पटणे, माधव स्वामी, प्रकाश केटीग, दिलीप कळसकर, श्रीराम पटाईत यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNandedनांदेड