शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी मिशन स्वाभिमान, लातूर झेडपीची विशेष कर वसुली मोहीम

By हरी मोकाशे | Published: November 22, 2023 6:38 PM

तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे.

लातूर : ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि गावातील नागरिकांना आवश्यक त्या सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत दर महिन्यातील एका विशिष्ठ दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली केली जाणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र, बहुतांश वेळा योजनेंतर्गतचा निधी कमी पडतो. तर काही वेळेस निधी उपलब्ध असूनही त्याचा गरजेच्या ठिकाणी वापर करण्यास नियमांचा अडसर येतो. त्यामुळे गावातील काही भाग अथवा संपूर्ण गाव आवश्यक त्या सुविधेपासून वंचित राहते. त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीचा भरणा केलेला कर उपयोगी पडतो. शिवाय, ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होते.

जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि गावातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष कर वसुली मोहीम राबविली जाणार आहे.

१० लाखांच्या विकास कामांचे बक्षीस...कर वसुली दिनात एक लाख अथवा त्यापेक्षा अधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसेवकाची त्यांच्या गोपनीय अहवालात नोंद केली जाणार आहे. सलग तीन महिने एक लाखापेक्षा अधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात शंभर टक्के कर वसुली करणाऱ्या ३ हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्याबरोबरच १० लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली जाणार आहे. तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसुलीत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस १० लाख, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गावास ७ लाख तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात येणार आहे.

२९ नोव्हेंबर रोजी विशेष कर वसुली मोहीम...प्रत्येक महिन्यातील एका दिवशी विशेष कर वसुली दिन राबविण्यात येणार आहे. २९ नोव्हेंबर, २३ डिसेंबर, २३ जानेवारी २०२४, २३ फेब्रुवारी या दिवशी विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत कर वसुली पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींना प्रोत्साहन...गावातील नागरिकांनी कर भरणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची कर वसुली होईल आणि त्याचा लाभ गावातील नागरिकांनाच होईल. शिवाय, शंभर टक्के वसुली बद्दल ग्रामपंचायतींना विकास निधीही दिला जाणार आहे. त्यातून ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळेल.- अनमोल सागर, सीईओ

विशेष पथकांची नियुक्ती...सीईओ अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुलीचे नियोजन करावे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद