शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

लातूर शहरात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे महापालिकेचे नियोजन

By हणमंत गायकवाड | Updated: April 6, 2024 13:01 IST

लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन सुरू

लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात १२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता आठ दिवसात ऐवजी पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. लातूर शहराला महिन्याला एक दलघमी पाण्याची गरज आहे. तर मांजरा प्रकल्प वरील सर्व योजना मिळून महिन्याला दोन दलघमी पाणी लागते. या सर्व बाबींचा विचार केला तर, सध्याचा उन्हाळा आणि पावसाळा संपेपर्यंत मांजरा प्रकल्पातील पाणी पुरवू शकते. त्यामुळेही पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

मांजरा प्रकल्पात एकूण पाणीसाठा ५९ दलघमी आहे. यातील १२ दलघमी जिवंत तर ४७ दलघमी मृत पाणीसाठा आहे. मांजरा प्रकल्पात वरील सर्व पाणीपुरवठा योजनांना त्यांच्या मागणीनुसार पाणी उचल झाले तरी उन्हाळा आणि पावसाळा संपेपर्यंत प्राप्त पाणीसाठा पुरवू शकतो. लातूर शहरासाठी दररोज ५५ ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काटकसर या नावाखाली शनिवार, रविवार, सोमवार असे तीन दिवस पाणी उचलणे बंद होते. यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात नियोजन सुरू केले आहे. शहरातील जलकुंभनिहाय वितरणाचे वेळापत्रक तयार केले जात आहे.

शहरातील अनेक विद्युत पंप आटलेलातूर शहरात विद्युत पंप आणि हातपंप आहेत. त्यापैकी अनेक पंपांचे पाणी गेलेले आहे. त्यामुळे आठ दिवसातला सोडण्यात येणारे पाणी शहरवासीयांना पुरत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळेही आता पाच दिवसात पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. पंपाची पाणी पातळी घटली आहे. या पंपाच्या जीवावर महापालिकेने आठ दिवसाआड पाणीपुरवठा गेल्या महिनाभरापासून सुरू केला होता. मात्र अनेक भागातून पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने आता पाच दिवसात पाणीपुरवठा केला जाईल.

शांतता समितीच्या बैठकीत आयुक्तांनी दिले संकेतशहरातील विद्युत पंपाचे पाणी पातळी घटलेली आहे. अनेक बोरचे पाणी गेलेले आहे त्यामुळे शांतता समितीच्या बैठकीमध्ये आयुक्तांनी पाच दिवसात पाणीपुरवठा करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे.

मांजरा प्रकल्पातील स्थितीप्रकल्पात सध्या: ५९:२५८ दलघमीप्रकल्पात मृत पाणीसाठा : ४७:१३० दलघमीजिवंत पाणीसाठा :१२:१२८ दलघमीजिवंतपाणीसाठ्याची टक्केवारी : ६.८५ टक्के

टॅग्स :laturलातूरWaterपाणी