शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रेणापूर तालुक्यातील तरूणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 17:58 IST

रेणापूर तालुक्यातील तत्तापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात दुपारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही.

लातूर : रेणापूर तालुक्यातील तत्तापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात दुपारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी ओम आत्मलिंग चिल्लरगे (२८ रा. तत्तापूर ता. रेणापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रीकांत उर्फ बबलू आत्मलिंग चिल्लरगे (२५) याचा लातुरातील ग्रामदैवत श्री रत्नेश्वर-श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात कोणीतरी अनोळखी व्यक्तींनी डोक्याच्या मागील भागावर हत्याराने हल्ला करुन खून केला.

ही घटना मंगळवारी रात्री घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, गांधी चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गफार शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे यांनी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत मयताचा भाऊ ओम चिल्लरगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात दुपारी अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनMarathwadaमराठवाडा