शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे अल्पभूधारक होणार भूमिहीन!

By हरी मोकाशे | Updated: March 29, 2024 16:07 IST

मुरुड अकोल्याच्या शेतकऱ्यांचा प्रशासनाकडे आक्षेप

लातूर : पवनार ते पत्रादेवी (नागपूर- गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यांतून जात आहे. त्यासाठी भूसंपादन होणार आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी भूमिहिन होणार आहेत. परिणामी, या महामार्गाबद्दल मुरुड अकोला येथील शेतकऱ्यांनी आक्षेप घेत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविल्या आहेत.

पवनार ते पत्रादेवी (नागपूर- गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ द्रूतगती महामार्ग (विशेष क्र. १०) हा होणार आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील २१ गावांच्या हद्दीतील शिवारातून जाणार आहे. त्यात लातूर तालुक्यातील मुरुड अकोला गावाचाही समावेश आहे. त्यासाठी आगामी काळात भूसंपादन होणार आहे. दरम्यान, या महामार्गासंदर्भात आक्षेप मागविण्यात आले आहेत.प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत मुरुड अकोला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. सध्याच्या जमिनी ह्या आमच्या जगण्याचे एकमेव साधन आहेत. विशेषत: जमिनी ह्या यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता जमिनी संपादित केल्यास आम्ही अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतो. तसेच आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते.

विशेष म्हजणे, काही जमिनी ह्या बारमाही बागायती आहेत तर काही भविष्यात एनए प्रयोजनाच्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर आमच्या जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. या जमिनी संपादित केल्यास आमचे कधीही भरुन न येणारे नुकसान होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

आमच्या जमिनी संपादित करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदवावर केदारनाथ बिडवे, श्रीमंत बिडवे, उत्तरेश्वर गिराम, जयश्री गिराम, लिंबाबाई गिराम, कलावती बनाळे, सोमेश्वर बिडवे, रामभाऊ शेळके, जयलिंग बिडवे, धनराज कुर्डे, संतोष तोडकर, श्रीपती बिडवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :laturलातूरhighwayमहामार्ग