शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

दोन वर्षांपासून राष्ट्रीय बायोगॅसचे अनुदानच 'गॅस'वर; कृषी विभागाकडे लाभार्थ्यांचे हेलपाटे

By हरी मोकाशे | Published: January 20, 2024 6:08 PM

याेजनेअंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारल्यास १२ हजारांचे अनुदान देण्यात येते.

लातूर : पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबरच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे. शिवाय, ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन योजना राबविण्यात येत आहे. दरम्यान, दुसरे वर्ष उलटत आले तरी अद्यापही गेल्या वर्षीच्या १२५ लाभार्थ्यांचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या लाभार्थी शेतकऱ्यांकडून वारंवार चौकशी करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वृक्षतोड वाढली आहे. परिणामी, हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्याचबरोबर काही घरांमध्ये इंधन म्हणून केरोसीनचा वापर करण्यात येतो. तो बंद व्हावा आणि पर्यावरणाचे संतुलन कायम रहावे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून अनुदानावर नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याेजनेअंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारल्यास १२ हजारांचे अनुदान देण्यात येते.

कृषी विभागाकडे लाभार्थ्यांचे हेलपाटे...नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन २०२२-२३ या वर्षात एकूण १२५ बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट होते. कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन सातत्याने प्रयत्न करीत उद्दिष्ट गाठले. मात्र, लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांकडून वारंवार कृषी विभागाकडे चौकशी करण्यात येत आहे.

लातूर, औश्यात सर्वाधिक सयंत्र...तालुका - सयंत्रलातूर - १७औसा - १७निलंगा - १५रेणापूर - ९शिरुर अनं. - ९उदगीर - १६अहमदपूर - १६चाकूर - १०देवणी - ८जळकोट - ८एकूण - १२५

बायोगॅस सयंत्र उभारणीकडे ओढा...बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी केंद्र सरकारकडून सर्वसाधारण लाभार्थ्यास १२ हजार रुपये तर अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना १३ हजार रुपये अनुदान देण्यात येते. याशिवाय, शौचालय जोडणी केल्यास जिल्हा परिषदेच्या सेसमधून लाभार्थ्यास मदत दिली जाते. दरम्यान, बायोगॅस सयंत्र उभारावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे दरवर्षी लाभार्थी संख्या वाढत आहे.

पाच वर्षांत ५०० सयंत्र उभारणी...वर्ष - एकूण सयंत्र२०१८-१९ : ११९२०१९- २० : ९८२०२०- २१ : ३८२०२१-२२ : १२०२०२२- २३ : १२५

सेंद्रीय खत निर्मितीस प्राधान्य...अधिकाधिक शेती उत्पादन घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. मात्र, त्याचे दुष्परिणाम शेतीवर होत आहेत. हे कमी व्हावे आणि सेंद्रीय खत वापरास चालना मिळावी अशाही हेतूने केंद्र शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शासनाकडे पाठपुरावा...नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी १२५ सयंत्र उभारण्यात आले आहे. शासनाकडून अद्यापही अनुदान उपलब्ध झाले नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. लवकरच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर