शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नव्या वसाहतीचा प्रस्ताव लालफितीत अडकला; घरांच्या पडझडीने ९०० पोलीस कुटुंबियांची परवड..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 19:15 IST

शासकीय निवासाची व्यवस्था नसल्याने अनेकांना भाड्याच्या घरात वास्तव्य करावे लागत आहे.

- राजकुमार जाेंधळे 

लातूर : शहरासह जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एकूण १ हजार ८५६ पैकी तब्बल ९०० पाेलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांच्या कुटुंबीयांसाठी उभारण्यात येणाऱ्या पाेलीस वसाहतींचे प्रस्ताव गत तीन वर्षांपासून लालफितीत अडकले आहेत. ठाेस निर्णयाअभावी प्रस्ताव धूळखात पडला असून, पाेलीस कर्मचाऱ्यांची मात्र परवड सुरूच आहे.

लातूर जिल्हा पाेलीस दलात कार्यरत असलेल्या जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध नाही. परिणामी, भाड्याच्या घरात गत अनेक दिवसांपासून वास्तव्य करावे लागत आहे. आता या वसाहती माेडकळीला आल्या असून, भिंतीना तडे गेले आहेत. नव्या वसाहतीबराेबरच पाेलीस ठाण्यांच्या इमारतीचे प्रस्ताव गत तीन वर्षांपूर्वी पाठविण्यात आले आहेत. यात उदगीर शहर, उदगीर ग्रामीण, शिवाजीनगर, विवेकानंद चाैक आणि लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यांचा समावेश आहे.

या वसाहतींची झाली दुरवस्था...लातूर शहरातील लेबर काॅलनी, नांदेड राेडवरील विवेकानंद चाैक परिसर, बाभळगाव रस्त्यावरील पाेलीस मुख्यालय यांच्यासह जिल्ह्यातील वाढवणा (बु.), किनगाव, उदगीर, निलंगा, अहमदपूर, औसा, रेणापूर, भादा, देवणी, शिरुर अनंतपाळ, चाकूर येथील पाेलीस वसाहतींची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे.

५० टक्के कुटुंबीयांची हेळसांड...लातूर जिल्हा पाेलीस दलातील २३ पाेलीस ठाण्यात सेवा बजावणाऱ्या एकूण १ हजार ८५६ पाेलीस कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ९०० वर कर्मचारी अर्थात ५० टक्के कुटुंबीयांना हक्काचा निवारा नाही. शासकीय निवासाची व्यवस्था नसल्याने अनेकांना भाड्याच्या घरात वास्तव्य करावे लागत आहे.

अनेक घरांना लागली घूस...ज्या वसाहतीमध्ये पाेलीस कुटुंबीयांना घर मिळाले आहे. त्यांची माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अनेक घरांना आता घूस लागली आहे. स्लॅबचा गिलावा गळून पडत असून, दारे-खिडक्याही माेडकळीला आल्या आहेत. अनेक वसाहतींना पावसाळ्यात गळती लागली आहे.

भाड्याच्या घराचा पर्याय...पाेलीस वसाहतींची माेठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने, काही कर्मचारी आहे त्या स्थितीत वास्तव्य करतात. तर काही कर्मचारी भाड्याच्या घरात राहण्याला प्राधान्य देतात. आपण सातत्याने दुरुस्ती, देखभालीबाबत प्रस्ताव पाठवताे. पुरेसा निधी उपलब्ध नाही झाला की, दुरुस्तीचे काम रखडते.- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर 

टॅग्स :Policeपोलिसlaturलातूर