शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
3
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
4
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
5
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
6
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
7
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
8
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
9
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
10
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
11
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
12
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
13
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
14
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
15
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
16
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
17
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
18
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
19
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
20
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 

मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही: जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर 

By संदीप शिंदे | Published: July 28, 2023 6:32 PM

जळकोट तालुक्यातील नुकसानीची पाहणी

जळकोट : तालुक्यात मागील आठवड्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेती, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शासकीय मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. प्रशासन शेतकऱ्यांसोबत असून, पंचनामे पूर्ण झाले आहेत. रस्ते, पुल व नुकसानीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले असून, लवकरच मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जळकोट तालुक्यातील रावणकोळा, मरसांगवी, अतनूर, शिवाजीनगर तांडा, गुत्ती, घोणसी या भागातील शेतीपिके व खरडून गेलेल्या जमिनीची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. प्रशासन तुमच्या सोबत असून, काळजी करू नका असे सांगून ज्यांच्या घराची पडझड झाली त्यांना घरकुल मंजूर करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच मरसांगवी शेजारी असलेल्या पुलाची उंची वाढवावी, दोन नद्यांचे पाणी गावात शिरल्याने संसाराेपयोगी साहित्य वाहून जात असल्याचे सुलोचना देवकर यांनी सांगितले. रावणकोळा येथील एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती सरपंच सत्यवान पाटील व सत्यवान दळवे यांनी दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी मेडेवार, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, सत्यवान पाटील दळवे, मेहताब बेग, रामराव राठोड, सत्यवान पांडे, रवी घोडके, चंद्रशेखर पाटील, शादुल्ला शेख, उमाकांत इमडे, आयुब शेख, बाबर पटेल, नबी शेख, मुखराम शेख, रेश्मा पटेल, सुरज भिसे, अतिक शेख, मंडळाधिकारी कांबळे, धनराज दळवे, इस्माईल मुंजेवार, विश्वनाथ वाघमारे, सुमनबाई वाघमारे उपस्थित होते.

प्रशासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी...नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मदत केली जाणार आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, कोणीही खचून जाऊ नये, असेही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसlaturलातूर