शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आता अन्नदाता करणार क्षयरुग्णांचे पोषण! लातूर जिल्हा परिषदेचा नवा उपक्रम

By हरी मोकाशे | Updated: March 2, 2024 17:02 IST

क्षयरुग्णांना औषधींबरोबरचे देणार प्रथिनेयुक्त आहार

लातूर : क्षयराेगावर मात करण्यासाठी रुग्णांना औषधींबरोबर सकस आणि प्रथिनेयुक्त आहार महत्त्वाचा असतो. शासनाकडून मोफत औषधी मिळतात. मात्र, आर्थिक अडचणींमुळे पोषक आहार मिळत नाही. परिणामी, घेतलेली औषधी पचत नाहीत. त्यातून रुग्ण आणखीन गळाटतो. दरम्यान, गरजू रुग्णांना पोषण आहार मिळावा म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने अन्नदाता उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्याच टप्प्यात २०० अन्नदाता मदतीसाठी पुढे आले आहेत.

क्षयरुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत गोळ्या- औषधी दिल्या जातात. तसेच त्यांना पुरेसा, सकस आणि प्रथिनेयुक्त आहार मिळणे आवश्यक असते. जिल्ह्यात सध्या १ हजार ९१० क्षयरुग उपचारावर आहेत. त्यापैकी एक हजारपेक्षा जास्त रुग्णांना सकस आहार मिळत नसल्याने त्यांनी पोषण किट देण्याची मागणी जिल्हा आरोग्य विभागाकडे केली आहे.

क्षयरुग्णांना प्रथिनेयुक्त आहार मिळावा म्हणून शासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शासनाने निक्षय मित्र धोरण अवलंबिले. मात्र, त्यास अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने अन्नदाता उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत २४ मार्चपर्यंत प्रत्येक रुग्णांना किमान तीन महिने पुरेल इतके धान्य (किट) उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

किटमध्ये काय असावे?...एक महिन्याच्या किटमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी यापैकी एक- ३ किलो, कोणतीही दाळ - १.५ किलो, खाद्यतेल- एक पॉकेट आणि शेंगदाणे- १ किलो असणे गरजेचे आहे.

पहिल्या टप्प्यात २०० निक्षय मित्र...जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीतून अन्नदाता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजे एका दिवसात जवळपास २०० जणांनी निक्षय मित्र होत पोषण आहारासाठी अन्नदाता होणार असल्याची नोंदणी केली आहे.

सामाजिक भावनेतून मदत करावी...जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या अन्नदाता उपक्रमात समाजातील दानशूर, नागरिकांनी सामाजिक भावनेतून सहभागी होऊन धान्यरुपी मदत करावी. या उपक्रमासाठी रक्कम देऊ नये. त्याऐवजी धान्य द्यावे. तसेच अन्नदाता कोण आहे, याची माहिती आहे. प्रत्येक निक्षय मित्रास केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाते.- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

समाजातीन नागरिकांनी मदतीसाठी पुढे यावे...क्षयरुग्णांना औषधीबरोबर प्रथिनेयुक्त आहार मिळाल्यास तो लवकर बरा होऊन सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकतो. त्यासाठी अन्नदाता उपक्रम राबविण्यात येत आहे. समाजातील सेवाभावी संस्था, नागरिकांनी धान्य किट देण्यासाठी पुढे यावे.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद