शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आता विव्हळत रात्र काढावी लागणार नाही; कुठल्याही वेळी मिळणार वाडीतांड्यावर तत्काळ औषधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 16:59 IST

या आरोग्य केंद्रांतून २४ तास सेवा दिली जात असली तरी दिवसभराच्या ठराविक वेळेनंतर सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, जखम झालेल्यांना साधी गोळीही मिळत नाही, हे वास्तव आहे.

- हरी मोकाशेलातूर : गावोगावी, वाडी- तांड्यांवरील लहान मुला- मुलींसह प्रत्येक नागरिकाला घरपोच औषध- गोळ्या उपलब्ध करणारा राज्यातील पथदर्शी प्रकल्प लातूर जिल्हा परिषदेने प्रस्तावित केला असून येणाऱ्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रत्यक्ष योजना कार्यान्वित होणार आहे. सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा आजारांसाठीची औषधे घेऊन आशा स्वयंसेवक गरजूच्या घरी तत्काळ पोहोचणार आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातून नाममात्र दरात रुग्णांना आरोग्यसेवा पुरविली जाते. या आरोग्य केंद्रांतून २४ तास सेवा दिली जात असली तरी दिवसभराच्या ठराविक वेळेनंतर सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी, जखम झालेल्यांना साधी गोळीही मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे अशा त्रासाने त्रस्त असलेल्यांना मेडिकल दुकानदाराचा आधार घ्यावा लागतो.

बहुतांश वेळेस रात्री- अपरात्री असा त्रास जाणवू लागल्यास विव्हळत रात्र काढावी लागते. त्यामुळे सकाळ कधी होईल आणि सरकारी दवाखाना अथवा मेडिकल दुकान कधी उघडेल, याकडे डोळे लागलेले असतात. सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी असा त्रास जाणवणाऱ्या खेड्यापाड्याबरोबरच वाडी- तांड्यावरील रुग्णांना तत्काळ गोळ्या औषधी मिळावी म्हणून जिल्हा परिषदेने १५ वित्त आयोगातून १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ७८६ ग्रामपंचायती असून त्याअंतर्गत ११९४ गावे, वाडी- तांडे आहेत. त्यासाठी एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २५२ उपकेंद्र आहेत. याअंतर्गत १ हजार ७०३ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांमार्फत वेदनाशामक गोळ्यांबरोबर जखमेवर मलमपट्टी, किशोरवयीन मुलींच्या रक्तवाढीसाठी गोळ्या दिल्या जाणार आहेत.

आशांना लवकरच मेडिकल किट...कोविड काळात आशा कार्यकर्ती यांचे उत्कृष्ट कार्य राहिले आहे. त्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करतात. त्यांना आता मेडिकल किट दिले जाणार असून त्यात गोळ्या औषधी असणार आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. या किटमुळे तत्काळ आरोग्य सेवा मिळणार आहे.- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

दुखणे अंगावर काढले जाणार नाही...आशा कार्यकर्ती यांना अद्ययावत मेडिकल किट दिले जाणार आहेत. त्यातून रुग्णांना वेळेवर सेवा मिळेल. त्यातून वेळ व पैशांची बचत होईल. तसेच ते दुखणे अंगावर काढणार नाहीत. याशिवाय, आशांचे सबलीकरण होईल.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :doctorडॉक्टरlaturलातूरmedicineऔषधं