शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

लातूर शहरात पाणीपुरीवाल्याचा खून; दाेघांना पाेलिस काेठडी

By राजकुमार जोंधळे | Updated: March 16, 2025 19:05 IST

न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरात पाणीपुरीचा व्यवसाय करण्यासाठी आलेल्या एका २० वर्षीय युवकाचा चाकूने भाेसकून खून करणाऱ्या दाेघांना रविवारी दुपारी लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, उत्तर प्रदेशातून लातूर येथे आलेल्या मनिष रूपसिंग पाल (वय २०, रा.घिलौर, ता.नंदीगाव, जि.जालाैन) हा युवक हरंगुळ (बु.) रेल्वे स्थानक परिसरात पाण्याच्या टाकीनजीक पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत हाेता. ताे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री आपला ठेला घेऊन घराकडे निघाला हाेता. दरम्यान, रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दत्ता संजय ढोरमारे (२०, रा.पटेलनगर, लातूर) आणि आयान अब्दुल शेख (२०, रा.कपिलनगर, लातूर) हे तेथे दाखल झाले. त्यांनी मनिष पाल याच्याकडे पैशाची मागणी केली.

त्यावेळी पैसे देण्यासाठी त्याने नकार दिला. यातूनच त्यांच्यामध्ये वादाला प्रारंभ झाला. यावेळी आराेपींनी मनिष याच्या पाेटात चाकू खुपसला आणि हातावरही सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेला मनिष रक्ताच्या थाराेळ्यात पडला. मारेकऱ्यांनी मनिषजवळील पैसे आणि माेबाइल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती त्याचा चुलत भाऊ याला मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत, मनिष पाल याला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले. 

या प्रकरणी एमआयडीसी ठाण्याच्या पाेलिसांनी दत्ता संजय ढोरमारे, आयान अब्दुल शेख याला शनिवारी दुपारीच अटक केली. त्यांना लातूर येथील न्यायालयात रविवारी दुपारी हजर करण्यात आले असता, न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे. तपास पाेलिस निरीक्षक सुधाकर देडे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर