शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

प्रदूषण मनभर; दंड कणभर ! पालिकेच्या दुर्लक्षाने लातुरात कचरा जाळण्याचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 8:50 PM

रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. काही नागरिक तो कचरा पेटून देतात. यामुळे मोठे प्रदूषण होत आहे.

लातूर : शहरात मोकळ्या जागी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे, तर काही ठिकाणी कचरा जाळला जात आहे. याकडे मनपाचे दुर्लक्ष असून, प्रदूषण वाढत आहे. दरम्यान, गुरुवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेजारी कचरा जाळल्याची घटना घडली. महापालिका प्रशासनाने ५०० रुपयांचा दंड आकारून जुजबी कारवाई केली. प्रदूषण मनभर अन् दंड कणभर अशीच मनपाची ही कारवाई आहे.

लातूर शहरामध्ये महापालिकेच्या वतीने घंटागाडी येते. या घंडागाडीतून घराघरांतील सुका आणि ओला कचरा संकलित केला जातो. मात्र, अनेक नागरिक कचरा घंटागाडीकडे न देता मोकळ्या जागी टाकतात. रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला असलेल्या रिकाम्या जागेत कचऱ्याचे ढीग पडलेले आहेत. काही नागरिक तो कचरा पेटून देतात. यामुळे मोठे प्रदूषण होत आहे. दयानंद कॉलेजच्या गेटसमोरील समांतर बार्शी रोडच्या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. या ठिकाणीही कचरा जाळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. प्रत्येक नगरातील अनेक ठिकाणच्या मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग आहेत. सकाळच्या सुमारास ते पेटलेल्या अवस्थेत असतात. याकडे मनपाचे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

गुरुवारी प्रभाग क्रमांक १५ मधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेजारी दाळमिललगत असलेल्या मैदानामध्ये वाहनाच्या आसनावर कचरा जाळला. या कचऱ्याच्या धुराचे लोट शहरभर पसरले होते. हे किती मोठे प्रदूषण आहे. यासंदर्भात मनपाने संबंधितास ५०० रुपयांचा दंड ठोठावला. किती ही जुजबी कारवाई, असा प्रश्न दररोज शहरात स्वच्छता मोहीम राबविणाऱ्या अनेकांनी उपस्थित केला.

टॅग्स :laturलातूरpollutionप्रदूषण