शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 18:54 IST

उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयेळे यांच्याशी संवाद

- संदिप शिंदे लातूर : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लातूर लोकसभा मतदार संघात झालेल्या जनजागृतीमुळे मतदानाचे प्रमाण वाढले़ विशेष म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंगभेद न पाहता लोकांनी मतदान करावे, यावर मोहिमेत भर देण्यात आला़ परिणामी, लातुरात चांगले मतदान झाले, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी दिपाली मोतीयाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

प्रश्न : मतदान वाढीसाठी केलेल्या जनजागृतीचा किती फायदा झाला?- लातूर लोकसभा मतदार संघात आम्ही मोठ्या प्रमाणात जनजागृती केली़ त्यामुळे अनेक नागरिकांनी स्वंयप्रेरणेतून पुढाकार घेतला़ डोक्यावर उन्हाची तीव्रता असतानाही मतदार घराबाहेर पडले़ शिवाय, महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी सखी केंद्र, दिव्यांगाचे सक्षम केंद्र निर्माण केले़ महिला किंवा दिव्यांग सक्षमपणे निवडणूक प्रक्रियेचे काम करू शकतात, हे यातून सिद्ध झाले आहे़ 

प्रश्न : मोहिमेत कोणत्या विषयावर अधिक भर दिला?- जनजागरण मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देण्यात आले़ ‘चुनावी पाठशाला’ उपक्रमातून शाळांमध्ये मतदान केंद्र उभारून विद्यार्थ्यांकडून निवडणूक प्रक्रिया करून घेण्यात आली़ याशिवाय, संकल्पपत्रेही पालकांना पाठविण्यात आली़ महिला, दिव्यांग, अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फतही रॅली काढून जनजागरण झाले़ आई-वडिलांना विद्यार्थ्यांना लिहिलेले संकल्पपत्र हे या मोहिमेत विशेष होते़ 

प्रश्न : निवडणूक प्रक्रियेत जनजागृतीचे नियोजन कसे होते?- निवडणूक आयोगाकडून नियोजनबद्ध कार्यक्रम देण्यात आला होता़ त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ताण जाणवला नाही़ स्वीप टीम जनजागृतीसाठी स्वतंत्र होती़ शाळा, महाविद्यालयाचा सहभाग घेऊन जनजागृती झाली़ उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यावर ते प्रचाराच्या कामात लागले आणि आम्ही मतदार जनजागृतीच्या कामात लागलो़ 

प्रश्न : जनजागृतीचे नेमके धोरण काय?- निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा हाच यामागचा मुख्य उद्देश आहे़ नवमतदारांना तसेच इतर मतदारांनाही मतदानाचे महत्व लक्षात आणून देण्याचे काम या माध्यमातून करण्यात येते़ जात, धर्म, पंथ न पाहता नि:पक्ष व निर्भयपणे मतदानासाठी लोकांचा सहभाग वाढावा यासाठी मोहिम राबविण्यात आली़ जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात जनजागृतीची मोहिम यशस्वी झाली़

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानlaturलातूर