शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
3
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
4
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
5
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
6
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
7
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
8
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
9
अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!
10
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
11
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
12
अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक
13
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
14
जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"
15
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
16
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
17
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
18
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
19
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
20
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"

परतीच्या पावसाआधीच शेतकऱ्यांना दिलासा; रेणा मध्यम प्रकल्पांत ६५ टक्के पाणीसाठा!

By संदीप शिंदे | Published: August 28, 2024 3:36 PM

रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती.

रेणापूर ( लातूर) : तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची चांगली हजेरी आहे. त्यामुळे रेणा मध्यम प्रकल्प ६४.३१ टक्के भरला असून, शेतकऱ्यांची व नागरिकांची चिंता मिटली आहे. परतीच्या पावसाला काही दिवस बाकी असताना त्याअगोदरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रेणापूर तालुक्यामध्ये चांगला पाऊस झाला. दरवर्षी परतीच्या पावसामध्ये रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. याच काळात जास्त प्रमाणात जलसाठा झाल्यास पाण्याची क्षमता पाहून धरणातून रेणा नदीपात्रात पाणी सोडले जाते. मात्र गतवर्षी संपूर्ण पावसाळात व परतीचा पाऊस पडला नाही. त्यामुळे मध्यम प्रकल्पात कमी जलसाठा होता. मध्यम प्रकल्पात यंदा जुनपर्यंत केवळ १.५ टक्के जलसाठा होता.

रेणापूर तालुक्यात तसेच प्रामुख्याने धरण क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने पाण्याची २१ टक्क्याने पाणी पातळी वाढला होती. त्यानंतर पाऊस पडत गेल्याने जलसाठ्यात वाढ होत गेली. २४ जुलैला ३१.१५ टक्के जलसाठा झाला. पुन्हा २४ व २५ जुलै रोजी तालुक्यात व प्रकल्प क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने या प्रकल्पात एक दिवसात पंधरा टक्क्याने पाणी वाढवून हा प्रकल्प २६ जुलैच्या सकाळी दहा वाजेपर्यंत ५१.९२ टक्के भरला आहे. अधून-मधून पावसाच्या सरी बरसत असल्याने प्रकल्पात पाण्याचा येवा सुरुच आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत प्रकल्पात ६४.३१ टक्के साठा झाला आहे. प्रकल्प भरत असल्याने रेणापूर तालुक्यातील अर्ध्या गावांची तसेच अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांच्या पाणीपुरवठा योजनेची चिंता मिटली असून, याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीसाठी तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्यासाठी फायदा होणार आहे. दरम्यान, अद्याप परतीचा पाऊस बाकी असल्याने आगामी काळात पाण्याची आवक पाहता रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येण्याची शक्यता आहे.

परिसरात उसाच्या क्षेत्रात वाढ होणार....रेणा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला तर या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पानगाव, भंडारवाडी, कामखेडा, रामवाडी, फावडेवाडी, वाला, वालेवाडी, घनसरगाव, रेणापूर आदी गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. प्रकल्प ६४ टक्के भरल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करू शकतात. खरीप हंगाम संपल्यावर ऊसाची लागवड वाढण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पाणीसाठा चांगला झाल्याने पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

रेणापूर मध्यम प्रकल्प सद्यस्थिती...रेणा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा १३.२२० दलघमी असून, मृत पाणीसाठा १.१३ दलघमी आहे. एकूण पाणीसाठा १४.३५० दलघमी असून, पाण्याची टक्केवारी ६४.३१ असल्याची माहिती रेणा प्रकल्प शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी दिली. जुनच्या सुरुवातीला प्रकल्पात केवळ १.५ टक्के पाणीसाठा होता. मात्र, ८ जुनपासून सुरु झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :laturलातूरDamधरणRainपाऊसWaterपाणीFarmerशेतकरी