शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

कमालपूर शिवारात शाळकरी मुलाची हत्या, उजनी आराेग्य केंद्रात नातेवाइकांचा ठिय्या; दाेघा मित्रांवर संशय, एक ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: January 12, 2025 20:03 IST

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते.

राजकुमार जाेंधळे / उजनी (जि. लातूर) : औसा तालुक्यातील कमालपूर शिवारात एका शाळकरी मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी समाेर आली. याप्रकरणी दाेघा मित्रांवर संशय असून, एकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रितेश रवींद्र गिरी (वय १४) असे मयत मुलाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, कमालपूर येथे शनिवार, ११ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तीन मित्र रोजच्याप्रमाणे एकत्र आले. ते विजया विठ्ठल गिरी यांच्या शेतात गेले हाेते. दरम्यान, रितेश रवींद्र गिरी हाही या मुलासाेबत गेला हाेता. रात्र झाली तरी रितेश हा घरी परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी रात्रभर शाेध घेतला असता, ताे आढळून आला नाही. अखेर कुटुंबीयांनी साेबत असलेल्या मित्रांपैकी एकाला दरडावून विचारणा केली असता त्याने घटनेची माहिती देताना सांगितले की, रितेश गिरी याला आम्हीच जिवे मारून त्याचा मृतदेह साेयाबीनच्या ढिगाऱ्याखाली पुरला आहे. हे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला. त्यांनी विजया गिरी यांच्या शेतातील साेयाबीनच्या ढिगाऱ्याकडे धाव घेतली. भादा पाेलिसांनाही माहिती देण्यात आली. पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. साेयाबीनचा ढिगारा बाजूला केल्यानंतर रितेश गिरी या शाळकरी मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत.

पाेलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, उजनी आराेग्य केंद्रात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त नातेवाइकांनी आक्राेश करीत गुन्ह्यातील आराेपींना अटक करावी, या मागणीसाठी आराेग्य केंद्रातच ठिय्या मांडला. शिवाय, भादा पाेलिस ठाण्याचे सपाेनि. राहुलकुमार भाेळ यांना घेरावही घातला.

कमालपूर, उजनीमध्ये बंदाेबस्त...

घटनेचे गांभीर्य ओळखून कमालपूर आणि उजनी आराेग्य केंद्रात राज्य राखीव दलाच्या तुकड्या, भादा ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी बंदाेबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय, औसा डीवायएसपी कुमार चाैधरी यांनी घटनस्थळी भेट देऊन पाहणी केली.

तपासानंतरच कारणांचा उलगडा...

कमालपूर येथील १४ वर्षीय शाळकरी मुलाचा खून करण्यात आला असून, यातील संशयित मित्रांपैकी एकाला पाेलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. खून नेमक्या काेणत्या कारणासाठी करण्यात आला याचा पाेलिस शाेध घेत आहेत. तपासानंतरच कारणांचा उलगडा हाेणार आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर