शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
3
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
4
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
5
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
6
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
7
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
8
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
9
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
10
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
11
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
12
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
13
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
14
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
15
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
16
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
17
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
18
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
19
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
20
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस

लातुरात हिवाळ्यात पाण्यासाठी पायपीट; आणखी एक प्रकल्प जोत्याखाली, दाहकता वाढली

By हरी मोकाशे | Published: December 13, 2023 5:27 PM

लातूर जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली; अधिग्रहणासाठी १५ गावांचे प्रस्ताव

लातूर : गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी, डिसेंबरमध्येच पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. आणखी एका प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील आठपैकी तीन मध्यम प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के झाल्याने टंचाईची समस्या वाढू लागली आहे.

गत पावसाळ्यात विलंबाने पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला होता. पिकांपुरता पाऊस झाल्याने खरिपातील पिके चांगली उगवली होती. परंतु, ऑगस्टमध्ये जवळपास महिनाभरापेक्षा अधिक दिवस पावसाने ताण दिला. परिणामी, खरिपातील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. अल्प पावसामुळे जिल्ह्यातील मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह रेणा, तिरू या नद्याही वाहिल्या नाहीत. त्याबरोबर नालेही खळाळले नाही. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही.

जिल्ह्यात दरवर्षी परतीचा पाऊस होतो. मात्र, यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत प्रशासनाने ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी ४ कोटी २९ लाखांचा टंचाई निवारण आराखडा केला. दरम्यान, नोव्हेंबर अखेरीसपासून पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

व्हटी, तिरू, तावरजा जोत्याखाली...दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या वाढत आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी रेणापूर तालुक्यातील व्हटी आणि उदगीर तालुक्यातील तिरू या दोन मध्यम प्रकल्पांतील जलसाठा यापूर्वीच जोत्याखाली गेला आहे. आता लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठाच नाही.

मध्यम प्रकल्पात २६ दलघमी जलसाठा...जिल्ह्यातील पाच मध्यम प्रकल्पांत एकूण २६.०३७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यात रेणापूर मध्यम प्रकल्पात ३.८८२, देवर्जन - ३.४६९, साकोळ- ४.९२०, घरणी- ६.७६७, मसलगा- ६.६९९ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तावरजा, व्हटी आणि तिरू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक पाणीसाठा...प्रकल्प - टक्केवारीतावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १८.८९तिरू - ००देवर्जन - ३२.४८साकोळ - ४४.९४घरणी - ३०.१२मसलगा - ५१.४७एकूण - २१.३१

तलावात २३.९० टक्के साठा...लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत एकूण १३४ तलाव आहेत. या तलावात प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा ७५.१०७ दलघमी आहे. त्याची टक्केवारी २३.९९ अशी आहे. दरम्यान, दिवसेंदिवस जलसाठ्यात घट होत असल्याने प्रशासनाने जलसाठे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केले आहेत.

१५ गावांत पाणीटंचाईच्या झळा...डिसेंबरमध्येच जिल्ह्यातील १२ गावे आणि तीन वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या गावांनी १८ विहिरी, कूपनलिका अधिग्रहणाचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. पंचायत समितीने पाहणी करून पाच गावांचे प्रस्ताव तहसीलकडे सादर केले आहेत. त्यात लातूर- १, औसा - २, अहमदपूर -१, शिरुर अनंतपाळ तालुक्यात एका गावचा प्रस्ताव असल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी