शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'साहेब, आमचे संसार वाचवा'; गावात दारूबंदीसाठी महिलांनी गाठले थेट तहसील कार्यालय

By संदीप शिंदे | Updated: July 21, 2023 13:21 IST

महिलांनी अवैध दारुविक्री बंद करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी

रेणापूर : तालुक्यातील निवाडा गावातील महिलांनी दोन महिन्यापूर्वी अवैध दारु विक्री विरोधात गावात मोर्चा काढून विरोध केला होता. त्यानंतर अवैध दारु विक्री बंद होणे अपेक्षित होते. परंतु, तसे न होता, पुन्हा अवैध दारु विक्री जोमात सुरु असून, त्यामुळे मद्यपीचा गोंधळ सुरुच आहे. यामुळे अवैध दारु विक्री बंद करा या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी थेट तहसिलदारांचे दालन गाठले. गावातील दारू बंद करून आमचे संसार वाचवा अशी मागणी केली.

निवाडा येथे दारू विक्रीमुळे अनेक कुंटुबाचे संसार उघड्यावर आले आहेत. व्यसनामुळे अनेकांचे मुल-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. गावातील महिलांनी दारू बंद करावी असा ठाराव ग्रामसभेत मांडला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीनेही ठराव घेतला. तसेच संबधितांना वारंवार निवेदने दिली. मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे येथील महिलांनी गुरुवारी तहसील कार्यालय गाठले व तहसीलदार यांना निवेदन देऊन आपली कैफीयत मांडली. गावलील बेकायदेशीररित्या होणारी दारुविक्री बंद करावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक, दारूबंदी अधिकारी, पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले.

याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या महिलांनी दिला आहे. यावेळी पद्मामिबाई गायकवाड, मार्कस गायकवाड, रेखाबाई बड़े, वंदनाबाई बडे, शोभाताई घोडके, बालिकाबाई गायकवाड, विमलबाई गायकवाड, बळीराम गायकवाड, सत्यफुलाबाई गायकवाड, मीनाबाई गायकवाड, सुकुमारबाई गायकवाड, छायाबाई गायकवाड, इंदुबाई वाघमारे, वर्षाबाई गायकवाड, मिनाबाई गायकवाड, विमल गायकवाड, रंजनाबाई गायकवाड यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूरalcohol prohibition actदारुबंदी कायदा