शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

तीन दिवसावर बहिणीचे लग्न; विजेच्या धक्क्याने भावाचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: June 26, 2024 23:18 IST

निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील घटना.

राजकुमार जाेंधळे, औराद शहाजानी (जि. लातूर) : अवघ्या तीन दिवसांवर बहिणीची लग्न आहे. घरात लगीनघाई सुरू असताना भावाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना तगरखेडा (ता. निलंगा) येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सूरज गाेविंदराव माेरे (वय १८) असे मृत मुलाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील शेतकरी गोविंदराव मोरे यांचा मुलगा सूरज हा बुधवारी सायंकाळी घरातील गोठ्यात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेला हाेता. दरम्यान, गोठ्यातील पत्र्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा धक्का बसला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी औराद शहाजानी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेहाचे विच्छेदन केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने माेरे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. याबाबत औराद शहाजानी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हेडकाॅन्स्टेबल लतिफ सौदागर करत आहेत.

सूरज माेरे हा बारावीत हाेता...

औराद शहाजानी येथील महाराष्ट्र विद्यालयात सूरज हा बारावीमध्ये शिक्षण घेत हाेता. बुधवारी सायंकाळी विद्यालयातून घरी नेहमीप्रमाणे आला हाेता. घरातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गाेठ्यात गेला असता विजेचा धक्का बसला आणि त्यातच मृत्यू झाला.

बहिणीचा विवाह साेहळा येत्या रविवारी...

रविवार, ३० जून राेजी बहिणीचा विवाह साेहळा हाेता. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण हाेते. अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या लग्नसाेहळ्यापूर्वीच भावाचा असा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे.

टॅग्स :Accidentअपघात