शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
3
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
4
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
5
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
6
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
7
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
8
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
9
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
10
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
11
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
12
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
13
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
14
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
15
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
16
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
17
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
18
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
19
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
20
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?

शंखी गोगलगायीने नुकसान; भरपाईपोटी लातूर जिल्ह्याला मिळाले ९३ कोटी

By हणमंत गायकवाड | Published: September 14, 2022 5:50 PM

६८ हजार ३८५ हेक्टरचे नुकसान झाले असून १ लाख ५ हजार ६३६ लाभार्थी आहेत

लातूर : शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात ६८ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीच्या भरपाईपोटी शासनाकडून ९३ कोटी रुपये मदत मंजूर झाली आहे. १ लाख ५ हजार ६३६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत लवकरच वर्ग होणार आहे. या मदतीचा अध्यादेश शासनाने बुधवारी काढले आहेत.

जुलै महिन्याच्या प्रारंभापासून लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरीप पिकांवर वेगवेगळे रोग पसरले गेले. यलो मॅझिकसह शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव पिकांवर झाला. जिल्ह्यातील ६८ हजार ३८५ हेक्टरवरील पिके शंखी गोगलगायीने फस्त केले होते. शासनाच्या आदेशानुसार पंचनामे केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली. १ लाख ५ हजार ६३६ शेतकऱ्यांच्या शेतातील खरीपाचे पिक शंखी गोगलगायीने फस्त केले.२ हेक्टरपुढील ९२ हजार ६५२ शेतकऱ्यांच्या ५९ हजार ७६४.३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याला शासनाने नुकसान भरपाई म्हणून ४० कोटी ६३ लाख ९७ हजार रुपये मंजूर केले आहेत. तर २ ते ३ हेक्टरपर्यंत १२ हजार ९८४ शेतकऱ्यांच्या ८ हजार ६२०.७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शासनाने ११ कोटी ७२ लाख ४२ हजार रुपये मंजूर केले आहेत.२ हेक्टरपर्यंत आणि ३ हेक्टरपर्यंत मिळून १ लाख ५ हजार ६३६ शेतकऱ्यांच्या ६८ हजार ३८५ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडून ९३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

प्रतिहेक्टर अशी मिळणार मदत...लातूर जिल्ह्यामध्ये जिरायत पिकाचे नुकसान झालेले आहे. बागायत किंवा बहूवार्षिक पिकाच्या नुकसानीचे क्षेत्र जिल्ह्यात निरंक आहे. त्यामुळे जिरायत (खरीप) पिकांसाठी प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपये शासनाकडून जाहीर झाले असून, त्याची मदतही मंजूर झाली आहे. ३ हेक्टर पर्यतच्या नुकसानीसाठी मदत मंजूर झाली आहे. या सुत्रानुसार जिल्ह्याला ९३ कोटी रुपये मंजूर झाले आहे, असे १४ सप्टेेंबर रोजी निघालेल्या अध्यादेशात म्हंटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीlaturलातूर