शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
कोरोना काळात जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार 1-1 कोटी रुपये, CM आतिशी यांची घोषणा
3
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
4
बाबो! नवरी जोमात, नवरदेव कोमात; लग्नाच्याच दिवशी केली शॉपिंग, पैसे घेऊन नववधू पसार
5
पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित
6
है तय्यार हम! T20 वर्ल्ड कपसाठी सरावाचा श्रीगणेशा; एका ट्रॉफीसाठी १० संघ मैदानात, PHOTOS
7
IDFC first Bank मध्ये IDFC Ltd चे होणार विलीनीकरण; गुंतवणूकदारांचा कसा होणार फायदा?
8
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच
9
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
10
Sunil Tatkare on BJP Mahayuti: "भाजपा मित्रपक्षांना सन्मानाने वागवतो याचं उदाहरण म्हणजे..."; सुनील तटकरेंनी थेट पुरावाच दिला
11
मुशीर खानचा भीषण अपघात! मुंबईच्या संघाला मोठा झटका; BCCI ने दिली महत्त्वाची माहिती
12
सलमानसोबत हिट सिनेमा, मात्र करिअरमध्ये अभिनेत्री ठरली अपयशी, १२ वर्षांपासून आहे कलाविश्वातून गायब
13
हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह 'खतम'! मुलीचाही मृत्यू; इस्रायली लष्कराचा मोठा दावा
14
Investment Tips : गुंतवणूकदारांसाठी आली सुरक्षित गुंतवणुकीची संधी, सरकार उभारणार २० हजार कोटी, तुम्हालाही संधी मिळणार
15
IND vs BAN, 2nd Test Day 2 : एकही चेंडू नाही फेकला अन्.. ९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
17
Som Pradosh 2024: पितृपक्षात सोम प्रदोष व्रताची संधी म्हणजे दुप्पट लाभ; अवश्य करा 'ही' एक कृती!
18
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
19
फवाद खानच्या पाकिस्तानी सिनेमाला भारतात बंदीच! 'द लीजेंड ऑफ मौला जट' प्रदर्शित होणार नाही, कारण...
20
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम

सोयाबीन, तुरीच्या दरात घसरण सुरूच; दरवाढीच्या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा

By संदीप शिंदे | Published: January 05, 2024 6:55 PM

सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती.

उदगीर : येथील मार्केट यार्डमध्ये सोयाबीनची आवक दिवसेंदिवस कमी होत असून, दरही घसरत आहेत. खरिपाचे शेवटचे पीक असलेल्या तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली असल्याने दरवाढीची आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. त्यातच रब्बीच्या नवीन हरभऱ्याची आवक बाजारात तुरळक प्रमाणात सुरू झाली आहे.

यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीप पिकांना बसला. सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती. परंतु, हंगामाच्या सुरुवातीला असलेला ४ हजार ६०० दर मध्यंतरी ५ हजार २५० पर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढीची आशा लागली होती. दर वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी विक्री न करता त्यांचा माल घरी ठेवला होता. परंतु, मागील एक महिन्यापासून सोयाबीनच्या घरात घट होत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. बाजारात आवक जरी कमी झाली असली तरी दरदेखील कमी होत चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झालेली आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवीन तुरीची आवक बाजारात सुरू झाली. सुरुवातीला दर ९ हजार ८०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल होता. मागील वर्षी तुरीला हंगामाच्या शेवटी उच्चांकी १२ हजार क्विंटलचा दर मिळाला होता. परंतु, एक आठवड्यापासून तुरीच्या दरात प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपयांची घट झाली आहे. शुक्रवारी बाजारात चांगल्या प्रतीच्या तुरीला ८ हजार ५०० प्रति क्विंटलचा दर मिळाला. येणाऱ्या काळात तुरीच्या घरात आणखी घट होण्याची शक्यता व्यापारी वर्तवीत आहेत. दरम्यान, रब्बीच्या नवीन हरभऱ्याची आवक बाजारात तुरळक सुरू झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना धोका दिल्यामुळे हरभऱ्याचा पेरा मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यातच हवामानामध्ये बदल होत असल्याने हरभऱ्याची पीक हाती किती येईल याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात शंकाच आहे. नवीन हरभरा ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दराने विक्री झाला.

थेट खरेदी केंद्रामुळे मोंढ्यात आवक कमी...सोयाबीनचे उत्पादन दर्जेदार झालेले आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांनी ठिकठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले असून, मार्केट यार्डपेक्षा ५० ते ७० रुपयांचा जास्तीचा दर मिळत असल्याने अनेक शेतकरी त्यांचा माल मार्केट यार्डात विकण्यापेक्षा खासगी कंपनीच्या केंद्रावर विकत आहेत. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये आवक कमी होत आहे. त्वरित वजन, कुठलीही कपात नाही, खात्यात लगेच रक्कम येत असल्याने शेतकऱ्यांचा कल खासगी कंपनीच्या केंद्राकडे वाढला आहे.

आगामी काळात दरवाढीची अपेक्षा कमी...बाहेर देशातून खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात होत असल्यामुळे स्थानिक बाजारातील सोयाबीनच्या खाद्यतेलास तसेच सोयाबीनच्या पेंडीला मागणी कमी झालेली आहे. याचा एकत्रित परिणाम होऊन कारखानदाराकडून सोयाबीनची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर घसरत आहेत. पुढील काळात निवडणुका असल्यामुळे दरवाढीची शक्यता फारच कमी असल्याचे व्यापारी अमोल राठी यांनी सांगितले.

 

टॅग्स :FarmerशेतकरीlaturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र