शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

बाजारात सोयाबीन गडगडले; तुरीच्या दरात उसळी !

By संदीप शिंदे | Published: January 24, 2024 5:24 PM

सौदा न निघताच उदगीरच्या बाजारात शेतमालाची खरेदी

उदगीर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी सोयाबीनचा दर शासनाने घोषित केलेल्या ४ हजार ६०० रुपये क्विंटलच्या हमीदरापर्यंत खाली घसरला आहे. पुढील काळात हे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर तूरीच्या दारात ५०० रुपयांनी वाढ झाली असून, बुधवारी उदगीर मार्केट यार्डमध्ये व्यापाऱ्यांनी सौदा न काढताच शेतमालाची खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली.

सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत आहे. मागील आठवड्यात ४ हजार ६५० रुपये असलेला दर या आठवड्यात ५० रुपयांनी घसरून ४ हजार ६०० पर्यंत खाली आला. खाद्य तेलाचे दर घसरत असल्याने व सोयाबीन पेंडीला मागणी नसल्यामुळे सोयाबीनचे दर भविष्यात आणखी कमी होतील अशी शक्यता आहे. तर तुरीच्या डाळीला सध्या मागणी असल्याने तुरीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे.

मागील आठवड्यात तूर ९ हजार ३०० रुपये क्विंटल दराने विक्री होत होती. परंतू सुरु आठवड्यात तुरीच्या दरात पाचशे रुपयांनी वाढ होऊन चांगल्या प्रतीच्या तुरीला ९ हजार ८०० रुपयापर्यंत दर मिळाला. उदगीरमध्ये सौद्याच्या वेळी समितीचे प्रभारी सचिव व हमालामध्ये बाचाबाची झाल्यामुळे सौदा निघाला नाही. सुरुवातीला बाजार बंद राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू दुपारी व्यापाऱ्यांनी पोटलीचा दर काढून शेतमालाची खरेदी केली. जर सौदा निघाला असता तर बाजारात मोठ्या प्रमाणात आवक असलेल्या तुरीला चांगला दर मिळाला असता अशी भावना शेतकरी व्यक्त करीत होते. पुढील तीन दिवस मार्केट यार्ड श्री गुरु हावगीस्वामी यात्रेनिमित्त बंद राहणार असल्याने व्यापारी मागतील त्या दराने शेतमाल विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली.

तर मिळाला असता १० हजारांचा दर...बाजार समिती व हमालामध्ये झालेला वाद वेळीच मिटवला असता तर सध्या तुरीला दर १० हजारांवर मिळाला असता. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान टळले असते. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबाबत सर्वांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे आडत असोशिएशनचे अध्यक्ष श्रीधर बिरादार यांनी सांगितले. तर प्र.सचिव प्रदीप पाटील म्हणाले, बाजार समिती व हमालामध्ये आज गैरसमजातून वाद झालेला आहे. सौदा काढून शेतमालाचे वजन माप करून गावाकडे जाण्यास उशीर झाला असता म्हणून सौदा काढला नाही.

सद्यस्थितीत तूर विक्रीसाठी योग्य वेळ...सध्या बाजारात तुरीला दर चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दरात विक्री करण्यास हरकत नाही. दरवाढीची आशा करून तुरी विक्री विना ठेवल्यास घरी कीड लागणे, वजनात तूट येणे या प्रकारे नुकसान होण्याची शक्यता असते. सध्या मिळणारे दर हे शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आहेत. खरीप हंगामात नुकसान झाले आहे. आता तूरीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. सोयाबीनचे दर कमीच आहेत. त्यामुळे तूर विक्रीसाठी योग्य वेळ असल्याचे व्यापारी चंद्रकांत बिरादार यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र