शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

सोयाबीन पीक धोक्यात; गोगलगायींच्या उपद्रवातून वाचले; पण हिरव्या अळयांकडून पिके फस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 20:10 IST

शेतकरी त्रस्त, पावसाची रिपरिप चालू असल्याने मशागत पूर्ण होत नाही, असे चित्र आहे.

लातूर : सोयाबीन उत्पादक शेतकरी दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत सापडलेला दिसून येत आहे. गतवर्षी गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी त्रस्त होते. तर यंदा पान खाणाऱ्या हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. त्यातच पावसाची रिपरिप चालू असल्याने मशागत पूर्ण होत नाही, असे चित्र आहे. यामुळे सोयाबीन पिवळे पडत असून, अळ्या पिके फस्त करीत आहेत.

महाराष्ट्रात लातूर जिल्हा सोयाबीन उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातोय. एकूण खरीप क्षेत्रापैकी ८० ते ८५ टक्के सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात आहे. पाच लाख हेक्टरवर यंदा सोयाबीनची पेरणी झालेली आहे. वेळेत पाऊस पडल्यामुळे आणि वेळेत पेरण्या झाल्यामुळे सोयाबीन बहरले आहे. पण त्यावर हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. फवारणी करावी तर पावसाची रिपरिप आहे. पूर्ण मशागत होत नाही. त्यामुळे अळ्यांचा नायनाट होत नाही, अशा अडचणीत सोयाबीनचे पीक आले आहे.

पेरणीनंतर पावसाची रिपरिप सुरूचपेरणीनंतर जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे. पिकांची वाढ चांगली झाली. सतत रिमझिम पाऊस पाऊस होत असल्याने काही ठिकाणी पिके पिवळी पडू लागली आहेत. तर बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकावर हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४७० मिमी पाऊस झाला आहे. अनेक शेतात सध्या वापस नाही. त्यामुळे पिके पिवळी पडत आहेत. परिणामी, फवारणी करता येत नसल्यामुळे हिरव्या अळ्यांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हिरव्या अळ्या यंदा सोयाबीन पिकावर परिणाम करतील, असे शेतकरी बोलत आहेत.

कीटकनाशकाचा पुरवठा करणे आवश्यककृषी विभागाने गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना मेटाल्डीहाईट कीटकनाशक पुरवठा केला होता. तसेच नॅनो युरिया, नॅनो डीएपी दिले होते. आता अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशके देण्यात यावीत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी कृषी विभागाकडे केली आहे.

फवारणी पंप देण्याची घोषणा हवेतचपिकांवरील प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना फवारणी पंप देण्यासाठी घोषणा केली होती. अनेक शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. काही जणांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र, अर्ज केलेल्या अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. फवारणी पंप देण्याची योजना हवेतच विरली आहे. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना पंप देण्याची आवश्यकता होती. अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता या पंपाची मदत झाली असती. 

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र