शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

प्रत्येक आजारांच्या निदानासाठी दर आठवड्याला विशेष आरोग्य मोहीम

By हरी मोकाशे | Published: September 01, 2023 5:30 PM

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी आयुष्मान भव उपक्रम

लातूर : ग्रामीण भागातील नागरिकांना लवकरात लवकर आरोग्यसेवा मिळावी तसेच त्यांच्यात आजारासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भव मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रात दर आठवड्यास विविध आजारासंदर्भात आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत आयुष्मान भव ही मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य सेवा खेड्यापाड्यातील, तांड्यावरील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शिवाय, आरोग्यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची तपासणी केली जाणार आहे.

आयुष्मान कार्डसाठीच्या लाभार्थ्यांची नोंदणी व कार्ड वितरण, आरोग्य सेवा- सुविधांची आणि आभा कार्डची जनजागृती, आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी अथवा रविवारी विशेष आरोग्य शिबीर, तसेच ० ते १८ वयोगटातील अंगणवाडी व प्राथमिक शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

पहिल्यांदा असांसर्गिक आजारांची तपासणी...

आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील विशेष दिनी मधुमेह, कॅन्सर, रक्तदाब अशा असांसर्गिक आजारांची तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या आठवड्यात कुष्ठरोग, क्षयरोग व इतर सांसर्गिक आजारांची, तिसऱ्या आठवड्यामध्ये माता व बालक तसेच पोषण आहार आणि लसीकरणाची माहिती देऊन उपक्रम राबविले जाणार आहेत. चौथ्या आठवड्यात कान- नाक- घसा व इतर आरोग्यसेवांसाठी शिबीर होणार आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची मदत घेण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पहिल्याच दिवशी २२५ गावांत उपक्रम...केंद्र शासनाची आयुष्मान भव ही नवी मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील २२५ गावांमध्ये आरोग्याच्या जनजागृतीबरोबरच तपासणी शिबीर घेण्यात आले. तसेच औषधोपचार देण्यात आले आहेत.

अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम...

केंद्र शासनाच्या वतीने आयुष्मान भव ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम चार महिने राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत आरोग्यासंदर्भात जनजागृती, तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्य