शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

दुष्काळी अनुदान, पीकविम्यासाठी रेणापूर तहसील कार्यालयामध्ये ठिय्या

By हरी मोकाशे | Published: May 31, 2024 8:05 PM

रेणापुरात शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन

रेणापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान आणि पीकविमा देण्यात यावा. सर्व कारखान्यांनी ऊसाला ३ हजार १०० रुपये प्रति टन भाव देवून त्यानुसार बिल अदा करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात शुक्रवारी दुपारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केल्यामुळे पीकविमा लागू करावा. केवायसीविना अनुदान वाटप करावे. मागील वर्षीचे अनुदान जमा झाले नाही. त्याची माहिती द्यावी. तलाठ्यांनी गावोगावी जाऊन ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही, अशा खातेदारांची यादी तयार करावी आणि अनुदान तात्काळ वाटप करावे. तालुक्यातील किती शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. त्याची माहिती द्यावी. केवायसीचा प्रश्न सोडविण्यासाठी बँकेसोबत शेतकरी संघटनेची बैठक घेण्यात यावी. सर्व कारखान्यांनी ऊसाला ३ हजार १०० रूपयांप्रमाणे भाव द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष बाळासाहेब भंडारे, संपर्कप्रमुख दत्ता शिंगडे, तालुका उपाध्यक्ष अच्युत मुळे, शेतकरी गोविंद माने, खलंग्रीचे उपसरपंच ज्ञानोबा वाघमारे, दिलीप बोकडे, सोपानराव लहाने, अशोक आगरकर, ज्ञानोबा काळे, निशांत देशमुख, अरविंद घाडगे, विठ्ठल येलाले, तुकाराम येलाले, प्रशांत गाडगे, ईश्वर बंडापल्ले यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या १० जून रोजी रेणापूर तहसील कार्यालयास टाळे ठोकून रेणापूर- पिंपळफाटा येथे रस्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा किसान सेनेचे व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोळंगे यांनी दिला आहे.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलन