शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', PM नरेंद्र मोदींची बेंजामिन नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
5
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
6
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
7
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
8
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
9
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
10
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
11
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
12
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
14
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
15
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
16
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
17
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
18
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
19
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
20
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या

लातूर जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी ३५३९ पशुधनाचे वंधत्व निवारण

By हरी मोकाशे | Published: December 07, 2023 6:57 PM

लातूर जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे.

लातूर : दूध उत्पादन वाढविण्यासाठी तसेच भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्यात वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २६० गावांत शिबीरे घेण्यात आली. त्यात ३ हजार ५३९ पशुधनांवर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय पशुधनाची एकूण संख्या ५ लाख १३ हजार आहे. त्यात प्रजननक्षम पशुधनाची संख्या २ लाख ४१ हजार ४८ अशी आहे. दरम्यान, सन २०२१- २२ मधील आकडेवारीनुसार दररोजची प्रति व्यक्तीसाठीची राज्यातील दूध उपलब्धता ही ३१५ ग्रॅम आहे. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत राज्यातील प्रति दिन प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता ही १२९ ग्रॅमने कमी आहे. तसेच भाकड जनावरांची संख्याही अधिक आहे. दुधाळ जनावरे भाकड राहण्याचे प्रमुख कारणे म्हणजे त्यांच्यातील वंध्यत्व होय. राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गायी- म्हशींची प्रजनन क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या वतीने २० नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत राज्यव्यापी वंधत्व निवारण अभियान राबविण्यात येत आहे.

अभियानाअंतर्गत तपासणी, उपचारराज्यव्यापी वंधत्व निवारण अभियानअंतर्गत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक पशुधन तपासणी व उपचार शिबिर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत २६० गावांमध्ये शिबीर घेण्यात आले आहेत. त्यात ३ हजार ५३९ भाकड जनावरांची तपासणी करण्यात येऊन वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात आले आहेत. उर्वरित गावांत येत्या १९ डिसेंबरपर्यंत शिबीर घेण्यात येणार आहेत.

अडीच लाख जनावरे प्रजननक्षमजिल्ह्यात गाय आणि म्हैसवर्गीय पशुधन संख्या ५ लाख १३ हजार असली तरी सध्या त्यातील २ लाख ४१ हजार ४८ जनावरे प्रजननक्षम आहेत. सध्याचा कालावधी हा पशुधन गाभण राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिबिरादरम्यान, भाकड जनावरांची तपासणी करुन तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. त्यासाठी अभियानपूर्वी गावोगावी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली आहे.

२१ दिवसानंतर पुन्हा तपासणी...शिबिरादरम्यान पशुधनावर वंधत्व निवारणाचे उपचार करण्यात येत आहेत. त्यानंतर पुन्हा २१ दिवसांनी या जनावरांची तपासणी करण्यात येणार आहे. तेव्हा सदरील पशुधन गाभण राहिले की नाही, हे पाहून आणखीन उपचार केले जाणार आहेत. जिल्ह्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी आणि भाकड जनावरांची संख्या कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी