शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

थांबे ५५, ऑटोरिक्षा ८ हजारांवर; लातूरातील वाहतूक अडथळ्याचे कारण समोर

By हणमंत गायकवाड | Published: October 11, 2023 1:59 PM

रिक्षांच्या प्रमाणात थांबे कमी असल्याने वाहतुकीला अडथळा; रिक्षांची संख्या वाढली पण थांब्यांची का नाही?

लातूर : शहरामध्ये ऑटोरिक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत थांब्यांची संख्या वाढविली जात नाही. त्यामुळे ऑटोरिक्षाचालक कुठेही थांबून प्रवासी घेतात. परिणामी, वाहतूक कोंडी अथवा रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी थांबे वाढविण्याची गरज असल्याचे ऑटोरिक्षा चालक संघटनांचे म्हणणे आहे.

शहरात सद्यस्थितीत ५५ थांबे आहेत. सरासरी एका थांब्यावर दहा ते पंधरा ऑटोरिक्षा थांबण्याची क्षमता आहे. त्यानुसार थांब्यावर ६०० च्या आसपास ऑटोरिक्षा असतात. तर याचवेळी रस्त्यांवर धावणाऱ्या ऑटोंची संख्या हजार ते दीड हजारांच्या आसपास असू शकते.उर्वरित ४ हजार ऑटोंनी थांबायचे कुठे, असा प्रश्न ऑटो चालकांना सतावत आहे. त्यामुळे ऑटो चालकांच्या काही संघटनांनी ‘होऊ द्या चर्चा’ असा प्रश्न घेऊन १२ ऑक्टोबरला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, हनुमान चौक, गांधी चौक, पाच नंबर चौक, जुना रेणापूर नाका, नवीन रेणापूर नाका, अहिल्यादेवी होळकर चौक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.औसा रोड रेमंड शोरुम नजीक, राजीव गांधी चौक, राजीव गांधी चौक-२, बसवेश्वर चौक-२, गूळ मार्केट, गंजगोलाई, छत्रपती शाहू महाराज चौक.विवेकानंद चौक, गरुड चौक, मिनी मार्केट चौक, लोकमान्य टिळक चौक, बाभळगाव चौक, म्हाडा कॉलनी प्रवेशद्वार, आरटीओ ऑफिस आदी ठिकाणी अधिकृत थांबे आहेत.

किमान १५० थांबे असावेतशहरामध्ये किमान १५० थांबे करण्यात यावेत, अशी मागणी रिक्षाचालक सेनेचे अध्यक्ष त्र्यंबक स्वामी तसेच परवानाधारक ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी केली आहे. थांबे वाढविल्यानंतर वाटेतच ऑटो थांबवून प्रवासी घेण्याचे प्रमाण कमी होऊन रहदारीला अडथळा होणार नाही. ऑटो थांबण्याची क्षमता वाढविल्यानंतर जागोजागी ऑटो थांबणार नाहीत. यामुळे ऑटो चालकांवर खटले दाखल होण्याचे प्रमाणही कमी होईल. 

थांबे वाढविण्याबरोबरच या आहेत मागण्या...ऑटोरिक्षा परमिट बंद करण्यात यावे, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करण्यात यावी, रिक्षाचालक कल्याणकारी मंडळासाठी घोषित केलेले ५ कोटी रुपये देऊन अंमलबजावणी करावी, रिक्षाचालकांच्या वारसांना आर्थिक मदत करावी, लातूर शहरातील सिटी बसमध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी घेतले जातात. ते नियमानुसार घेण्यात यावेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीlaturलातूर