शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

जलजीवन मिशनअंतर्गत अडीच वर्षांमध्ये लातूर जिल्ह्यात केवळ १९९ नळयोजनांचे बळकटीकरण!

By हरी मोकाशे | Published: May 29, 2024 5:04 PM

जलजीवन मिशनच्या कामातील स्थानिक पातळीवर अडचणी सुटेनात

लातूर : जलजीवन मिशनअंतर्गत सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात नळयोजना बळकटीकरणाची ८०७ कामे मंजूर करण्यात आली. अडीच वर्षांचा कालावधी उलटला असतानाही केवळ १९९ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नळयोजना कधी पूर्ण होणार अन् पिण्यासाठी शुध्द व पुरेसे पाणी कधी मिळणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.

प्रत्येक घरास दररोज ५५ लिटर शुध्द पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने जलजीवन मिशन अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्याअंतर्गतची सर्व गावे आणि वाडी- ताड्यांतील नागरिकांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी योजनेअंतर्गत नळयोजना बळकटीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास अडीच वर्षांपूर्वी ८०७ कामे मंजूर करण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाने जवळपास ६५० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, आतापर्यंत केवळ १९९ कामे पूर्ण झाली आहेत.

औसा तालुक्यात सर्वाधिक कामे पूर्ण...तालुका - काम पूर्णअहमदपूर - २९औसा - ४३चाकूर - २०देवणी - ०४जळकोट - ०५लातूर - १५निलंगा - ३४रेणापूर - १७शिरुर अनं. - ०९उदगीर - २३एकूण - १९९

आठ योजनांना प्रारंभच नाही...जलजीवन मिशनअंतर्गतच्या आठ नळ योजना बळकटीकरणाच्या कामांना अद्यापही प्रारंभच झाला नाही. त्यात औसा तालुक्यातील १, देवणी- ४, शिरुर अनंतपाळ- २ आणि उदगीर तालुक्यातील एका योजनेचा समावेश आहे. या योजना सुरु व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने सातत्याने सूचना करण्यात येत आहेत.

स्थानिक राजकारणाने योजनेमध्ये व्यत्यय...जलजीवन मिशनअंतर्गतच्या विहिरीसाठी तसेच जलकुंभासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर सोपविण्यात आली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे जागा उपलब्ध झाली नाही. परिणामी, ८ योजनांची कामे सुरु झाली नाही. त्यामुळे अद्यापही कामाचा श्रीगणेशा झाला नाही.

० टक्के काम - ०८२५ टक्के - ११७५० टक्के - १८०७५ टक्के - १९८९९ टक्के - १०५१०० टक्के - १९९

तहसीलदार, बीडीओंनी जागेचा तिढा सोडवावा...जलजीवन मिशनअंतर्गतच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विहीर, जलकुंभासाठी ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही. तसेच ज्या ठिकाणचे जलस्त्रोत कोरडे पडले आहेत, त्या ठिकाणचे सर्वेक्षण करुन नवीन जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाई...जलजीवन मिशनअंतर्गतच्या कामांना गती देण्यासाठी सातत्याने बैठका घेण्यात येत आहेत. वेळेत काम न करणाऱ्या गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाईही करण्यात येत आहे. तसेच काही गुत्तेदारांना काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे.- उदय देशपांडे, उपकार्यकारी अभियंता.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीLatur z pलातूर जिल्हा परिषद