शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

तांबरवाडी, सिकंदरपूर लातूर जिल्ह्यातील 'सुंदर' गावे; प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस, ग्रामस्थांत आनंद

By हरी मोकाशे | Updated: December 5, 2024 18:36 IST

पाहणी व तपासणीअंती मुल्यांकनात औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाले.

लातूर : आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही गावांनी बाजी मारली आहे. त्यामुळे जिल्हास्तरावर ही दोन्ही गावे स्मार्ट ठरल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे दोन्ही गावात आनंद व्यक्त होत आहे.

राज्य शासनाच्या वतीने आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना राबविण्यात येते. योजनेअंतर्गत सन २०२२- २३ मध्ये तालुकास्तरावर प्रथम आलेल्या जिल्ह्यातील १० गावांची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आली होती. यात स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञान अशा पाच मुलभूत निकषांप्रमाणे भेटी देऊन कामांची आणि अभिलेख्यांची पडताळणी करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील दहाही गावांचे निकालाकडे लक्ष लागून होते.

समान गुण मिळाल्याने दोन्ही गावे प्रथम...आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत शेलदरा (ता. जळकोट), बामणी (ता. उदगीर), आंबेगाव (ता. देवणी), गणेशवाडी (ता. शिरुर अनंतपाळ), काटेजवळगा (ता. निलंगा), तांबरवाडी (ता. औसा), सिकंदरपूर (ता. लातूर), पोहरेगाव (ता. रेणापूर), तिवघाळ (ता. चाकूर) आणि सताळा (ता. अहमदपूर) या दहा गावांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. पाहणी व तपासणीअंती मुल्यांकनात औसा तालुक्यातील तांबरवाडी आणि लातूर तालुक्यातील सिकंदरपूर या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण मिळाले. त्यामुळे या दोन्ही गावांची संयुक्तरिक्त्या जिल्हास्तरीय सुंदर गाव म्हणून निवड झाली आहे.

प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस...आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेअंतर्गत तालुका पातळीवर प्रथम आलेल्या गावांना प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस दिले जाते. जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावास ३० लाखांचे पारितोषिक दिले जाते. त्यानुसार तांबरवाडी आणि सिकंदरपूर या दोन्ही गावांना प्रत्येकी ३० लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

दोन्ही गावांचे उत्कृष्ट कार्य...स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत आवश्यक असलेल्या निकषांची पूर्तता करीत तांबरवाडी आणि सिकंदरपूर या दोन्ही गावांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यामुळे समान गुण मिळाले. परिणामी, संयुक्तरित्या दोन्ही गावे जिल्हास्तरावर प्रथम आली आहेत. जिल्ह्यातील इतर गावांनीही अशा पध्दतीने गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा.- बाळासाहेब वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद