शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

शेती वाटणीच्या वादातून भयंकर कृत्य; धूलिवंदनाला भर चौकात गाठून एकाचा खून  

By संदीप शिंदे | Updated: March 26, 2024 15:29 IST

शेतीच्या वादातून एकाचा खून; औसा तालुक्यातील टाका येथील घटना

बेलकुंड (जि. लातूर) : शेती वाटणीच्या कारणावरून औसा तालुक्यातील टाका येथे टाका सोमवारी सायंकाळी ७:३० वाजता एकाचा खून झाल्याची घटना घडली असून, याबाबत भादा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर शिंदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, टाका येथील भास्कर दगडू शिंदे, संतोष दगडू शिंदे व रमाकांत दगडू शिंदे यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद होता. सोमवारी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास भास्कर शिंदे हे गावातील मुख्य चौकात आले असता, संतोष शिंदे, रमाकांत शिंदे, सोन्या मोरे व विजया मोरे यांनी त्यांना गाठून शेतीच्या वाटणीच्या विषयावरून झटापट करून जखमी केले. त्यानंतर धारदार शस्त्राने शरीरावर वार केल्याने भास्कर शिंदे हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

याप्रकरणी सदानंद भास्कर शिंदे यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध कलम ३०२, ३२३ अंतर्गत भादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी औशाचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी गोसावी, भादा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार भोळ यांनी भेट दिली. पुढील तपास उपनिरीक्षक व्यंकट कुसमे करीत आहेत. दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर