शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

By संदीप शिंदे | Published: August 10, 2023 5:11 PM

ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही.

किनगाव : यंदाच्या खरीप हंगामात अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी रिमझिम पाऊस पडला. तोही उशिराने आल्याने पेरण्यासही विलंब झाला आहे. सध्या पिके बहरात असतानाच मागील १३ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी, पिकांनी माना टाकल्या असून, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

किनगाव परिसरात सध्या दररोज कडक ऊन पडत असून ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही. शेतातील नाले व बंधारे कोरडेच आहेत. मध्यम जमीनीवरील पिकांनी माना टाकल्या असून, चांगल्या प्रतीच्या जमिनीवरील पिके थोडीशी तग धरून आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे यावर हजारो रुपयांचा खर्च केला आहे.

किनगाव मंडळामध्ये सर्वाधिक पेरा हा सोयाबीन, तूरीचा आहे. तर मुगाचे प्रमाण अत्यल्प आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे ते शेतकरी स्प्रिंकलरद्वारे पिकांना जगवण्याची धडपड करीत आहेत. मुगाला सध्या फुले आली असून, त्यावरही मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ज्या शेतकऱ्याकडे पाण्याची सुविधा उपलब्ध नाही ते शेतकरी हताशपणे वाळणाऱ्या पिकाकडे बघत आहेत. एकीकडे पिके वाळत आहेत तर दुसरीकडे पीक जगण्यासाठी शेतकरी धडपड करत असल्याचे चित्र आहे.

पाऊस न पडल्यास पिके हातची जाणार...चार दिवसांमध्ये पाऊस पडला नाही तर पिके हातची जातील. हजारो रुपये खर्च करून पेरलेले बी-बियाणे, पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाकडून मदतीची अपेक्षा असल्याचे देवकरा येथील शेतकरी वामनराव गुट्टे यांनी सांगितले.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीlaturलातूर