शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

मोठा दिलासा! दमदार पावसाने लातूर जिल्ह्याचा भू-जलस्तर १.३५ मीटरने वाढला

By संदीप शिंदे | Published: October 20, 2022 6:35 PM

चांगला पाऊस असल्याने भूजल पातळीत वाढ

लातूर : मागील तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. यावर्षीही समाधानकारक पाऊस झाला असल्याने लघु, मध्यम प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. परिणामी, जिल्ह्याची पाणीपातळी १.३५ मीटरे वाढली आहे. 

जूनच्या सुरुवातीला उशिरा पाऊस झाला. जुलै महिन्यात सर्वच भागात तर ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठ्या प्रमाणात हजेरी होती. आता ऑक्टोबर महिना सुरू असला तरी मागील चार दिवसांपूर्वी औराद, निलंगा, औसा तालुक्यात पावसाने हजेरी लावली. काही महसूल मंडळांत तर अतिवृष्टीही झालेली आहे. त्यामुळे नदी, ओढे, नाले प्रवाहित झाले होते. त्यामुळे भूजलाचे पुनर्भरण झाले असून, ऑक्टोबर महिन्यात पाणीपातळीत वाढ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा भूजल पातळीत १.३५ मीटरने वाढ झाली असून, ही दिलासादायक बाब आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून झालेला समाधानकारक पाऊस भूजल पातळी वाढीसाठी पोषक ठरला असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.

तालुकानिहाय पाणीपातळीतील वाढमागील पाच वर्षांच्या तुलनेत अहमदपूर तालुक्यात १.६१ मीटर, औसा २.१२, चाकूर १.१२, लातूर २.५०, निलंगा १.१८, शिरूर अनंतपाळ ०.२१, रेणापूर १.०१, उदगीर १.३२, जळकोट २.०६, देवणी ०.३५ अशी एकूण सरासरी १.३५ मीटरने पाणीपातळी वाढली असल्याचे समोर आले आहे.

प्रत्येकी तीन महिन्यांनी नोंद...भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे दर तीन महिन्यांनी सर्व तालुक्यांतील निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीची नोंद घेतली जाते. यंदा झालेले पर्जन्यमान व मागील पाच वर्षांच्या पाणीपातळीचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. सप्टेंबर महिन्यात भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षण नोंदीतून भूजलस्तर १.७९ मीटरने वर आल्याचे समोर आले आहे.

जलसंवर्धनासाठी पुढाकार घ्यावा...जिल्ह्यात मागील आणि यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १.३५ मीटरने पाणीपातळी वाढलेली आहे. पाणीपातळी वाढली असली तरी पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब साठविणे आवश्यक आहे. जलसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. - एस. बी. गायकवाड, वरिष्ठ भूवैज्ञानिक लातूर

टॅग्स :laturलातूरRainपाऊस