शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

चार महिन्यांपासून अनुदानाचा छदामही नाही; ५३ कोटी थकल्याने लाभार्थी आर्थिक संकटात!

By हरी मोकाशे | Updated: August 9, 2024 18:42 IST

उसनवारी करुन बांधकाम साहित्याची खरेदी

लातूर : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची प्रगती व्हावी म्हणून मग्रारोहयोअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. मात्र, चार महिन्यांपासून बांधकाम व अन्य आवश्यक साहित्याचे ५३ कोटी ५३ लाखांचे अनुदान थकित राहिले आहे. दरम्यान, काही लाभार्थ्यांनी वेळेवर अनुदान मिळेल, या आशेने उसनवारी केली. परंतु, अनुदानापोटी शासनाकडून छदामही मिळाला नसल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाकडे वारंवार चौकशी करीत आहेत.

ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून शेती उपयोगी, पाणीपुरवठा, दळणवळण, पर्यावरण संवर्धनाची कामे व्हावीत व शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेचा मजूर, शेतकऱ्यांना चांगला लाभ झाला आहे. त्यामुळे मग्रारोहयोअंतर्गतच्या कामांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दर आठवड्यास कामाचे मोजमाप करुन मजुरांना मजुरी दिली जाते तर अकुश म्हणजे आवश्यक साहित्यापोटी अनुदान देण्यात येते.

मग्रारोहयोअंतर्गत विविध ११ कामे...मग्रारोहयोअंतर्गत बांबू, वृक्ष लागवड, जनावरांचा गोठा, शेततळे, वैयक्तिक व सामुहिक सिंचन विहीर, रोपवाटिका, तुती लागवड, रस्ते, ग्रामपंचायत भवन, दुतर्फा वृक्ष लागवड, सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर अशी ११ प्रकारची कामे करण्यात येतात. या कामांसाठी रोपे, विटा, वाळू, सिमेंट, सळई अशा कामांसाठी कुशल म्हणून निधी देण्यात येतो.

सिंचन विहिरींचे १३ कोटी रखडले...कामाचा प्रकार - थकित रक्कमबांबू, वृक्ष लागवड - १० लाख ६ हजारजनावरांचा गोठा - १० कोटी ७० लाखशेततळे - २१ लाख ५५ हजारसिंचन विहीर - १२ कोटी ९६ लाखरोपवाटिका - ४ लाख ४४ हजारतुती लागवड - ३ लाख १५ हजाररस्ते - २८ कोटी ९९ लाखग्रामपंचायत भवन - ४२ लाख ४५ हजारशोषखड्डे - १ लाख ८४ हजारवृक्ष लागवड - ४५ हजारसार्वजनिक पाणीपुरवठा विहीर - ३ लाख ३९ हजारएकूण - ५३ कोटी ५३ लाखतालुका - प्रलंबित निधीअहमदपूर - २,४१,४८,०६०औसा - ५,४१,१७,३९७चाकूर - १०,९१,६८,३६८देवणी - ५,९५,७७,१९४जळकोट - १,३०,६०,९७२लातूर - ९,२५,१७,८६२निलंगा - ८,३६,३२,६९२रेणापूर - ४,५०,४५,१७१शिरुर अनं. - ३३,२६,१६४उदगीर - ५,०८,०३,११६एकूण - ५३,५३,९६,९९७

उसनवारी करुन गोठा बांधला...पशुधनाच्या संरक्षणासाठी मग्रारोहयोअंतर्गत गोठा बांधला. अनुदानापेक्षा अधिक प्रमाणात पैसा खर्च झाला. वेळेवर अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, चार महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने मोठी अडचण झाली आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदान द्यावे.- अर्जुन उटगे, हरंगुळ बु.

गोठा बांधल्यामुळे पेरणीला पैसे नव्हते...मग्रारोहयोअंतर्गतच्या कामाचे वेळेवर पैसे मिळतात म्हणून शेतात गोठा बांधला. मात्र, अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे खरीप पेरणीवेळी अडचण निर्माण झाली. तेव्हा उसनवारी करावी लागली. शासनाने अनुदानाचे लवकर वितरण करावे.- नागेश वाघमारे, हरंगुळ बु.

शासनाकडे अनुदानाची मागणी...मग्रारोहयोअंतर्गत अनुदान ऑनलाईनरित्या जमा होतात. काही दिवसांपासून कुशलचे अनुदान थकित राहिले असल्याने शासनाकडे अनुदान मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच लाभार्थ्यांना कळविण्यात येईल.- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

टॅग्स :laturलातूर