शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निवडणुकीत विचार अन् तत्त्वाच्या राजकारणापासून फारकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 20:23 IST

अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांच्याशी संवाद

लातूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्य उद्देश बाजूला राहत आहे. विचार आणि तत्त्वाच्या राजकारणाला बगल देत मुद्याऐवजी गुद्याचे राजकारण केले जात आहे. प्रबोधनाऐवजी एकमेकांवर चिखलफेकच प्रचारात दिसून येत आहे. मागच्या पाच वर्षांत काय केलं आणि पुढे काय करणार या मुद्यांवर निवडणुकीत चर्चा होताना दिसत नाही. व्यक्तिगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप करणे आणि मतदारांचे मनोरंजन करणे हाच अजेंडा दिसतोय. असे परखड मत अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी त्यांच्याशी केलेल्या संवादात व्यक्त केले.

व्यसनविरोधी कायदा अद्याप प्रलंबित

विचार, तत्त्वाच्या राजकारणाची मांडणी उमेदवारांकडून होत नाही. लोकशाहीसाठी उमेदवारांचे हे तंत्र अडथळा ठरेल.केजी टू पीजीपर्यंत मोफत शिक्षण. आम जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी विमा कवच. या मुद्यांवर तर कोणी बोलतच नाही. तरुणांना रोजगाराची हमी, शेतकऱ्यांसाठी नावीन्यपूर्ण योजना घेऊन कोणताही उमेदवार समोर आलेला दिसत नाही. प्रस्तुत मुद्दे महत्त्वाचे असताना त्याला कोणी हात घालत नाही. व्यसनविरोधी कायदा अंनिसच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला, पण अंमलबजावणी होत नाही, हे मुद्देही राजकीय पक्ष विसरलेले आहेत. 

लोकशाही आणि संविधान मूल्यांची जपणूक व्हावी

स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही लोकशाहीची मूल्ये आहेत. परंतु, हल्ली विचार स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय की काय, असे वाटते आहे. निर्भीडपणे विचार मांडता यावा, याचे स्वातंत्र्य आपल्या लोकशाही राज्यामध्ये आहे. लोकशाही संवर्धनासाठी केवळ राजकीय पक्षांकडून गप्पा मारल्या जातात. वास्तवात प्रयत्न होताना दिसत नाहीत. लोकशाही आणि संविधान मूल्यांना जपणे राजकीय पक्षांबरोबर नागरिकांचे कर्तव्य आहे.नवमतदारांनी सद्सद्विवेक जागृत ठेवून मतदान करावे, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल. विकासाचे धोरण आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणाऱ्यांना बळ द्यावे.

टॅग्स :laturलातूरElectionनिवडणूकPoliticsराजकारण