शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

By हरी मोकाशे | Published: July 29, 2024 6:56 PM

यंदा उडीद, मूगाचा पेरा वाढला; पांढऱ्या सोन्याची लागवड दुप्पट!

लातूर : यंदा मृगाने दमदार बरसात केल्याने जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून खरीप पेरण्यांना प्रारंभ झाला. वरुणराजाचे वेळेवर आगमन झाल्याने जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा उडीद, मुगाचा पेरा वाढला आहे तर पांढरे सोने असलेल्या कापसाची लागवड दुप्पट झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९९ टक्के पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा खरीपाचा ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्रावर पेरा होईल, असा अंदाज जिल्हा कृषी विभागाने व्यक्त केला होता. त्यादृष्टीने बी- बियाणे, खतांचे नियोजन केले होते. दरम्यान, मान्सूनअगोदरच रोहिण्या चांगल्या बरसल्या होत्या. तद्नंतर मृगानेही वेळेवर दमदार वर्षाव केला. तीव्र उन्हामुळे होरपळून निघालेल्या नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बळीराजाने चाढ्यावर मूठ धरण्यास सुरुवात केली. पेरणीनंतर पिकांसाठी योग्य पाऊस झाल्याने खरीप पिके बहरली आहेत. सध्या आंतरमशागतीस वेग आला आहे.

यंदाची पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ४९०९०६तूर - ७१४७५मूग - ७१४१उडीद - ५९४४कापूस - १६२३८

सन २०२३ मध्ये पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ५४८१७०तूर - ६४३९६मूग - ४४४९उडीद - २९७०कापूस - ७५३५सन २०२२ मध्ये पेरा (हेक्टर)...सोयाबीन - ४८९७५२तूर - ६८८८८मूग - ६०७६उडीद - ४०१९कापूस - ६१९१

जिल्ह्यात आतापर्यंत ४५१.५ मिमी पाऊस...लातूर - ४५७.०औसा - ४६१.१अहमदपूर - ५३५.९निलंगा - ४३४.७उदगीर - ३९९.६चाकूर - ४७२.५रेणापूर - ५४८.९देवणी - ३५०.३शिरुर अनं. - ३६४.१जळकोट - ४०८.२

सोयाबीनच्या क्षेत्रात ५७ हजार हेक्टरची घट...गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठेत सोयाबीनला भाव नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही पदरी पडत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. आगामी काळात चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी अन्य पिकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ५७ हजार हेक्टर क्षेत्राची घट झाल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत ९९.९९ टक्के पेरणी...जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ९९.९९ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. लातूर तालुक्यात १०९.७८, औसा - १०९.१९, अहमदपूर- ९४.६, निलंगा - ८९.४४, शिरुर अनं. - ९४.३४, उदगीर- ९९.१२, चाकूर - १०२.१७, रेणापूर -९९.१२, देवणी - ९६.६३, जळकोट -१०३.८९ टक्के पेरणी झाली आहे.

वेळेवर पाऊस, लवकर पेरणी...गेल्या दोन वर्षांत उशीरा पाऊस झाल्याने खरीप पेरण्याही विलंबाने झाल्या. त्यामुळे उडीद, मुगाचा पेरा घटला होता. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पेरण्याही लवकर सुरु झाल्या. परिणामी, तूर, उडीद, मुगाचे क्षेत्र वाढले आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे यंदा कापसाची लागवड वाढली आहे.- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी