शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

किल्लारी भूकंपातील मृतात्म्यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:33 IST

बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.

किल्लारी : ३० सप्टेंबर ही तारीख आजही किल्लारीकरांसह अवघ्या महाराष्ट्रालाच थेट १९९३ सालात घेऊन जाते आणि हजारो नागरिकांचे प्राण घेणाऱ्या प्रलयंकारी भूकंपाच्या कटू आठवणी जाग्या होतात. त्यामुळेच बुधवार दि. ३० रोजी किल्लारी भुकंपातील मृतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून सलामी देण्यात आली.

यावेळी तहसीलदार शोभा पुजारी, आ. अभिमन्यू पवार, सरपंच शैला लोहार, उपसरपंच युवराज गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप लोहार, सहायक पोलीस निरीक्षक म्हेत्रेवाड, विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

२७ वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात या परिसरातील हजारो नागरिकांचा जीव गेला. परिसरातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यामुळे दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी किल्लारी गावात उभारण्यात आलेल्या स्मृतिस्तंभासमोर श्रद्धांजली अर्पण करण्यात येते.

पुनर्वसनात अनेकांना घरे मिळाली. परंतु, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने घराची गरज निर्माण होत आहे. यासह येथील नागरिकांसमोर सध्या अनेक नागरी प्रश्न असून या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ज्यांनी या भुकंपात आपल्या आप्तांना गमवले होते, त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी दाटून आले आणि त्यांच्या आठवणींनी मन उचंबळून आले. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

 

टॅग्स :EarthquakeभूकंपKillari Earthquakeकिल्लारी भूकंपMarathwadaमराठवाडा