शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
3
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
4
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
5
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
6
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
7
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
8
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
9
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
10
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
12
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
13
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
14
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
15
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
16
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
17
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
18
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
19
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
20
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

नियमित आणि वेळेत उपचार केल्यास क्षयरोग आटोक्यात : एस.एस. फुलारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 7:42 PM

क्षयरोग झाल्याचे निदान झाल्यानंतर घरपोच औषधी पुरविण्यात येतात.

ठळक मुद्देवर्षभरात पावणेतीन हजार रुग्णांवर यशस्वी उपचार

लातूर : नियमित आणि वेळेत उपचार केल्यास क्षयरोग बरा होऊ शकतो. त्याअनुषंगाने जिल्हा क्षयरोग विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली असून, रुग्णाला क्षयरोग झाल्याचे निदान झाल्यानंतर घरपोच औषधी पुरविण्यात येतात. नोव्हेंबर २०१७ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत या उपक्रमांतर्गत २ हजार २७५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. हे रुग्ण ठणठणीत झाले असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस.एस. फुलारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

डॉ. फुलारी म्हणाले, क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर सहा महिने नियमित औषध घेतल्यानंतर क्षयरोग बरा होता. क्षयरोगमुक्त जिल्हा करण्यासाठी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. तपासण्या करून रोगाचे निदान केले गेले. त्यानंतर उपचार केल्यानंतर २ हजार २७५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यात अहमदपूर १९४, औसा १३९, चाकूर ९२, देवणी ५८, जळकोट ७३, लातूर शहर ७७८, लातूर ग्रामीण ४३३, निलंगा २०४, रेणापूर ७४, शिरूर अनंतपाळ ३४, उदगीर १९६ आदी २ हजार २७५ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. सद्य:स्थितीत अहमदपूर तालुक्यात ८०, औसा ५८, चाकूर ४२, देवणी २८, जळकोट ४२, लातूर शहर ३५२, लातूर ग्रामीण २१२, निलंगा ८८, रेणापूर ३२, शिरूर अनंतपाळ १२, उदगीर ८२ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णांचीही प्रकृती आता सुधारली असून, लवकरच ते क्षयमुक्त होतील, असेही जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. फुलारी यांनी सांगितले. 

क्षयरुग्णांवर मोफत उपचार... क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे क्षयरोग विभागाच्या वतीने समुपदेशन करून जनजागृती केली जाते. ज्या रुग्णांना क्षयरोग झाला, अशा रुग्णांवर मोफत उपचार केले जातात, असेही डॉ. फुलारी यांनी सांगितले. 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलLatur civil hospitalजिल्हा रुग्णालय लातूर