शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

मांजरात पुरेसा पाणीसाठा नसल्याने यंदा वीस हजार हेक्टरला फटका

By हणमंत गायकवाड | Published: January 01, 2024 6:18 PM

उजव्या कालव्या अंतर्गत साडेसात तर डाव्याअंतर्गत साडेदहा हजार हेक्टर क्षेत्र कोरडे

लातूर: ‘मांजरात’ यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा साठा झाला नसल्यामुळे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्या अंतर्गत सिंचन क्षेत्र कोरडे राहणार आहे. परिणामी, या पाण्यावर अवलंबून असलेला ऊस शेतकऱ्यांना यंदा मोडावा लागणार आहे. उजव्या कालव्याअंतर्गत ७ हजार ६६५ आणि डाव्या कालव्या अंतर्गत १० हजार ५५९ हेक्टर क्षेत्र बिगर ओलीताखाली राहणार आहे.

मांजरा प्रकल्पांतर्गत केज, कळंब, अंबाजोगाई, लातूर या चार तालुक्यातील क्षेत्र ओलिताखाली आहे. डावा कालवा ९० किमी अंतराचा असून सिंचन क्षेत्र १० हजार ५५९ हेक्टर आहे. तर उजवा कालवा ७६ किमी अंतराचा असून या कालव्या अंतर्गत ७ हजार ७६५ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. दोन्ही काव्याअंतर्गत १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र यंदा धरणात पाणी नसल्यामुळे रब्बी हंगाम व  पाण्यावर घेण्याची अन्य पिके घेता येणार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. जे पाणी धरणात आहे. ते पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे यंदा शेतीला पाणी मिळणार नाही. पिण्यासाठीच पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

कालव्या अंतर्गत ६० टक्के उसाचे पीक....मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत १८ हजार २२३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या क्षेत्रावर बहुतांश ऊस आहे. जवळपास ६० टक्के क्षेत्र उसाचेच आहे. येथील काही ऊस आता तोडणीवर आहे. तर काहींची तोडणी झालेली आहे. परंतु पाणी नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना हा ऊस मोडावा लागणार आहे. केवळ आणि केवळ कालव्याच्या पाण्यावर आहे असे क्षेत्र साठ टक्के आहे. त्यामुळे या क्षेत्रावरील ऊस यंदा मोडण्याशिवाय पर्याय शेतकऱ्यांकडे दुसरा नाही.

लातूर मनपाकडून पाणी वापरात काटकसरमांजरा प्रकल्पात सध्या २० टक्के जिवंत पाणीसाठा आहे. जिवंत पाणीसाठा पिण्यासाठा जून अखेर पुरू  शकतो. तरीपण लातूर महानगरपालिकेने पाणी वापराच्या अनुषंगाने काटकसर सुरू केली आहे. चार ते पाच दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता सात दिवसाआड केला आहे. दोन दिवस पुढे वाढविलेला आहे. यामुळे दररोज पाण्याची बचत होत आहे. पुढील चार महिन्यांमध्ये ०.४० एमएम क्यूब पाण्याची बचत होणार असल्याची माहिती लातूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी